शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
3
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
4
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
5
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
6
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
7
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
8
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
9
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
10
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
11
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
12
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
13
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
14
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
15
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
16
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
17
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
18
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
19
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
20
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘ई-पास’साठी कारणं दोनचं; रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत पुकारलेल्या संचारबंदीत आंतरजिल्हा प्रवासासाठी ‘ई-पास’ची आवश्यकता असून, त्यासाठी जिल्ह्याच्या ...

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत पुकारलेल्या संचारबंदीत आंतरजिल्हा प्रवासासाठी ‘ई-पास’ची आवश्यकता असून, त्यासाठी जिल्ह्याच्या सायबर सेलकडे हजारो अर्ज येत आहेत. पाससाठी रुग्णालय अथवा अंत्यसंस्कार या दोन कारणांशिवाय ई-पास मंजूरच होत नसल्याचे प्रत्येकाच्या लक्षात आले. त्यामुळे हीच दोन कारणे बहुतांशी पाससाठी अर्जदारांकडून दिली जात आहेत.

कोरोना महामारीचा कोल्हापूर जिल्ह्यात कहर झाला असताना, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने संचारबंदी पुकारली आहे. या संचारबंदीत आंतरजिल्हा प्रवास करायचा असेल तर ई-पास अनिवार्य आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी ‘ई-पास’साठी अर्ज केले जात आहेत. जिल्ह्यातून मुंबई, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी ठिकाणी जाण्यासाठी रोज ई-पासची मागणी होते. आतापर्यंत सुमारे २४ हजार ८०३ लोकांनी त्यासाठी अर्ज केले तर त्यापैकी योग्य कारण असलेल्या ५,०६४ जणांनाच ई-पास मंजूर केले, इतरांचे सबळ कारण अगर अपुरी कागदपत्रे असल्यामुळे ई-पास नामंजूर केले आहेत.

प्रवासासाठीची कारणे...

रक्तातील प्रथम नातेवाईकांचा नजीक काळात अचानक मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराला जाण्यासाठी, शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार लग्न समारंभासाठी जाणाऱ्या मोजक्या लोकांसाठी, अत्यंत गंभीर रुग्णाचे उपचारार्थ बाहेरगावी जाण्यासाठी ई-पास मंजूर केला जातो. पण त्याशिवाय बाहेरगावी शिकणाऱ्या मुलाला आणण्यासाठी जाणे, गावी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी जाणे, आदी कारणांसाठीही नागरिक अर्ज करत आहेत.

ही कागदपत्र आवश्यकच...

हॉस्पिटलचे काम असेल तर त्यांची कागदपत्रे, मेडिकलचे काम असेल तर त्याचा पुरावा, लग्नकार्य असेल तर लग्नपत्रिका, प्रत्येकाचा कोरोना चाचणी अहवाल आवश्यक आहे. शिवाय प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचे आधारकार्ड सोबत जोडावे लागते.

अवघ्या तीन ते चार तासात मिळतो पास...

‘ई-पास’साठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याची सायबर सेलमध्ये तपासणी केली जाते. तसेच सोबत जोडलेली आवश्यक कागदपत्रे जर योग्य असतील तर अर्ज केल्यानंतर अवघ्या तीन ते चार तासात पासबाबत मंजूर अथवा नामंजूर अशी निर्गती होते.

‘ई-पास’साठी असा करावा अर्ज

ई-पास आवश्यक असलेल्या नागरिकांनी कोल्हापूर पोलीस दलाचे http//covid19.mhpolice.in / या वेबसाईटवर जावून ज्या ठिकाणाहून प्रवास करायचा आहे, ते पोलीस आयुक्तालय अथवा जिल्हा पोलीस विभाग निवडावा. त्यानंतर स्वत:चे नाव, कोणत्या तारखेपासून प्रवास करायचा आहे ते लिहून, मोबाईल क्रमांक, प्रवासाचे कारण, वाहन क्रमांक, सध्याचा पत्ता, ई-मेल, प्रवास प्रारंभ ठिकाण ते अंतिम ठिकाण, सोबतच्या प्रवाशांची संख्या याची माहिती द्यावी.

- आतापर्यत ई-पाससाठी आलेले अर्ज : २४,८०३

- आठवड्यात ई-पाससाठी आलेले अर्ज : ८,७२४

- आतापर्यंत मंजूर केलेले ई-पास : ५,०६४

- प्रलंबित अर्ज : ००