शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

पावणेसात लाख शेतकऱ्यांचे राज्यपालांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:28 IST

जयसिंगपूर : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी केलेले तीनही कायदे रद्द करावेत, या मागणीचे राज्यातील ६ लाख ७६ हजार शेतकऱ्यांचे निवेदन ...

जयसिंगपूर : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी केलेले तीनही कायदे रद्द करावेत, या मागणीचे राज्यातील ६ लाख ७६ हजार शेतकऱ्यांचे निवेदन अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रविवारी मुंबई येथे देण्यात आले.

गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड या राज्यांतील लाखो शेतकरी कृषी कायदे मागे घेण्यासाठी ठाण मांडून बसले आहेत. देशातील सर्वच राज्यांतून या आंदोलनास शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, केंद्र सरकारकडून हे आंदोलन दोन राज्यांतील शेतकऱ्यांचे असल्याचे भासवून जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६ लाख ७६ हजार शेतकऱ्यांचे तीनही शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याचे निवेदन राज्यपाल कोश्यारी यांना देऊन केंद्र सरकारला राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी कायद्याविरोधातील तीव्र भावना कळविण्याचे विनंती करण्यात आल्याची माहिती माजी खासदार शेट्टी यांनी दिली.

शिष्टमंडळात आमदार कपिल पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, अर्जुन कोकाटे, राष्ट्र सेवा दलाचे अतुल देशमुख, गोवर्धन दबडे, सचिन शिंदे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोट - शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर राखून हे निवेदन केंद्र सरकारला तातडीने पाठवून देऊ, असे आश्वासन राज्यपाल कोश्यारी यांनी दिले असल्याचे सांगून शेट्टी म्हणाले, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून, हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो - २८०२२०२१-जेएवाय-०८

फोटो ओळ - मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबतचे निवेदन माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिले. यावेळी आमदार कपिल पाटील, प्रतिभा शिंदे, अर्जुन कोकाटे उपस्थित होते.