शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारने शेतकरी संघटनांशी चर्चा करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:16 IST

कोल्हापूर : येत्या अधिवेशनात राज्य सरकार कृषी कायद्यातील सुधारणा करण्याचे विधेयक पारीत करणार असल्याचे समजते. असे न करता ...

कोल्हापूर : येत्या अधिवेशनात राज्य सरकार कृषी कायद्यातील सुधारणा करण्याचे विधेयक पारीत करणार असल्याचे समजते. असे न करता सरकारने राज्यातील सर्व शेतकरी संघटनांशी चर्चा करूनच सुधारणेचा निर्णय घ्यावा. सरकारने घाईत कृषी विधेयकातील सुधारणांचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुंबईत भेट घेऊन केली.

राज्यातील शेती आणि शेतकरी अभूतपूर्व संकटात आहे. दिवसागणित शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. यामुळे खते, बियाणे, कीटकनाशके रास्त भावात मिळाव्यात. सिंचन सुविधा वाढवावे, शेतीसाठीची वीज पुरेशा दाबाने योग्य भावात मिळावी, कमी व्याज दरातील शेतीसाठीच्या कर्जाची मर्यादा वाढवावी, शेतमाल साठवणुकीसाठी शीतगृहांची सुविधा वाढवावी, स्वामिनाथन समिती शिफारशीप्रमाणे शेतमालाला उत्पादन खर्च आणि पन्नास टक्के नफा असा हमीभाव मिळण्याची यंत्रणा उभी करावी, अशा मागण्या शिष्टमंडळातर्फे करण्यात आल्या.

केंद्रांनी २०२० मध्ये आणलेले नवीन कायदे, सुधारणा शेतकऱ्यांना मारकच आहेत. हमीभाव राहणार असे मोघमपणे केंद्र सरकार सांगत असले तरी व्यापारी, मोठ्या कंपन्या यांना हमीभावापेक्षा कमी किमतीत शेतमाल खरेदी करता येणार नाही, असा उल्लेख नवीन कृषी कायद्यात नाही. म्हणून येत्या अधिवेशनात शेतकरी आंदोलनाच्या बाजूने उभे राहण्यासाठी केंद्रीय कायद्यांना विरोध करणारा स्पष्ट ठराव करावा, असे सुचवण्यात आले.

या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक नेत्या मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, सुभाष लोमटे, किशोर ढमाले, सीमा कुलकर्णी, सुभाष काकुस्ते, एस. व्ही. जाधव आदी उपस्थित होते.

फोटो : २९०६२०२१-कोल राजू शेट्टी भेट

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.