शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडे स्थिर आकार कोणी मागायचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:45 IST

दत्ता पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क म्हाकवे : महावितरण कंपनीकडून ग्रामपंचायत, शेतकऱ्यांसह सामान्य ग्राहकांवर मनमानी पद्धतीने स्थिर आकारांसह इतर करांची ...

दत्ता पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क

म्हाकवे : महावितरण कंपनीकडून ग्रामपंचायत, शेतकऱ्यांसह सामान्य ग्राहकांवर मनमानी पद्धतीने स्थिर आकारांसह इतर करांची आकारणी केली जाते. मात्र, गावात हवी ती जागा ताब्यात घेऊन तिथे विद्युत खांब, ‘डीपी’ बसवले जातात. मग त्याचे भाडे महावितरणकडून वसूल करायला नको का? असा सवाल ग्रामपंचायतीमधून केला जात आहे.

अलीकडील पाच-सहा वर्षांत महावितरणच्या बिलात अनेक प्रकारचे आकार लावले जात आहेत. त्यामुळे वीज बिलांचा आकडा फुगला आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतींच्या विद्युत पंपाच्या बिलांची व्यावसायिक दराने आकारणी केली जाते. ही बिले भरताना ग्रामपंचायतींची दमछाक होत आहे. बिले थकली की, महावितरण विद्युत पुरवठाच खंडित करते. स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत महावितरणला सर्व सुविधा देते. मात्र, त्यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारीही काही कमी नाहीत. नळपाणी पुरवठा योजनेची वीज बिले ग्रामपंचायतींना डोईजड ठरत आहेत. मिळणारा घरफाळा व पाणीपट्टी ही वीजबिले भरण्यासाठीच जात आहेत. त्यामुळे नोकर पगार, अपंग निधी कोठून द्यायचा हा प्रश्न आहे.

मीटर आमचे मग भाडे का?

बहुतांशी ग्राहकांनी मीटर स्वत: खरेदी केलेली आहेत. वीज जोडणीचा खर्चही ग्राहकच करतो, मग स्थिर आकाराच्या आडून मीटरचे भाडे का वसूल करता? असा प्रश्न शेतकऱ्यांसह इतर ग्राहकांमधून केला जात आहे.

शेतीपंपाचे मीटर बंद तरी....

शेतीपंपांची बहुतांशी मीटर बंद आहेत. अंदाजे रीडिंग टाकून बिलांची आकारणी केली जाते. त्यामुळे भरमसाट बिले येत असून शेतकऱ्यांच्या दृष्टीने वीज बिल म्हणजे ‘म्हशीपेक्षा रेडकू’ मोठे असेच आहे.

कोट-

"गावात पोल उभे केल्याबाबत ग्रामपंचायत जागेचे भाडे मागत नाही. पाणीपुरवठा ही गावची गरज आहे. त्यामुळे या योजनेची आकारणी ही व्यावसायिक न आकारता कृषिपंपाप्रमाणेच आकारावी. ग्रामपंचायतींना बळ देण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबत निर्णय घ्यावा.

-वंदना रमेश सावंत ( सरपंच, बानगे )

माझ्या शेतात महावितरणने दोन पोल उभा केल्याने दोन-तीन गुंठे जमिनीत मशागतच करता येत नाही. त्यामुळे नुकसान होते, याला जबाबदार कोण?

- रमेश पाटील, ( बेनिक्रे, शेतकरी)