शहरं
Join us  
Trending Stories
1
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
2
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
3
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
4
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
5
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
6
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
7
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
8
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
9
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
10
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
11
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
12
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
13
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
14
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
15
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
16
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
17
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
20
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई मॅरेथॉनमध्ये ‘वुई वाँट सर्किट बेंच’चा नारा

By admin | Updated: January 19, 2015 00:28 IST

अभिनव उपक्रम : जाधव यांनी कापले ४२ किलोमीटर अंतर

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात प्रथम सर्किट बेंच व त्यानंतर खंडपीठ व्हावे, या मागणीचा नारा आज, रविवारी कोल्हापूरचे सुपुत्र व पक्षकार प्रसाद जाधव यांनी मुंबई येथे आयोजित मॅरेथॉनमध्ये दिला. त्यांनी ४२ किलोमीटर अंतर पार केले. मॅरेथॉनमध्ये धावताना जाधव यांनी ‘वुई वाँट सर्किट बेंच’चा नारा दिला. मुंबई येथे आज छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून मॅरेथॉनला सुरुवात झाली.गेल्या २५-३० वर्षांपासून या प्रश्नासाठी कोल्हापूरसह रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर व सातारा या जिल्ह्यांतून लढा सुरू आहे. या जिल्ह्यांतील वकीलबांधव, नागरिक तसेच विविध संघटना या प्रश्नासाठी सातत्याने आग्रही आहेत. गतवर्षी झालेल्या मॅरेथॉनमध्ये ‘जर्नी फॉर जस्टिस’चा नारा प्रसाद जाधव यांनी दिला होता. त्यावेळीही त्यांनी खंडपीठाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी, तसेच जनजागृती करण्यासाठी हा प्रयत्न केला होता. मात्र, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी शासन सकारात्मक नसल्याचे दिसते.दरम्यान, आज या मॅरेथॉनचा प्रवास बांद्रा सी लिंक, वरळी व पुन्हा सीएसटी असा सुमारे ४२ किलोमीटरचा असा झाला. दुपारी त्यांनी हे अंतर पूर्ण केले. कोल्हापूरला खंडपीठ व्हावे, असा संदेश देणारा टी-शर्ट घालून आणि सोबत मागणीचा फलक घेऊन त्यांनी प्रवास पूर्ण केला. त्याच्याबरोबर कोल्हापुरातून गेलेले वकील काही अंतर या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये अ‍ॅड. कुलदीप कोरगावकर, अ‍ॅड. तेजगोंडा पाटील, अ‍ॅड. समीउल्ला पाटील, अ‍ॅड. योगेश तेली यांचा समावेश होता.
( प्रतिनिधी )

कोल्हापूरचे सुपुत्र व पक्षकार प्रसाद जाधव यांनी रविवारी मुंबईत झालेल्या मॅरेथॉनमध्ये कोल्हापूरच्या खंडपीठ प्रश्नासाठी सहभाग नोंदवून ‘वुई वाँट सर्किट बेंच’चा नारा दिला.