शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शहरभान कॉलम-०१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:25 IST

शहरभान आर्कि. जीवन बोडके कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. निवडणूक आघाड्या मोर्चेबांधणी, सत्ता समीकरणे, अमक्याची ताकद, ...

शहरभान

आर्कि. जीवन बोडके

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. निवडणूक आघाड्या मोर्चेबांधणी, सत्ता समीकरणे, अमक्याची ताकद, तमक्याची ताकद यांची नेहमीचीच साचेबध्द मांडणी सुरू झाली आहे. ही निवडणूक, त्याच त्या साचेबध्द राजकारणातून बाहेर पडून शहराला नवा विचार, नवी दिशा देणारी व्हावी, यासाठी शहरभान या नावाने एक सजग चळवळ आकार घेऊ लागली आहे. त्यातून पारंपरिक ढाच्यातून बाहेर काढून जबाबदार लोकप्रतिनिधित्व आकारास यावे, असा प्रयत्न सुरू झाला आहे. या चळवळीमागील भूमिका मांडण्याचा हा प्रयत्न...

‘शहर’ हे माणसाने निर्माण केलेले विश्व आहे. ‘शहरे’ एकमेकांबरोबर जुळवून घेऊन सलोख्याने जगायला शिकवतात. शहरी जीवन हे परस्परावलंबी असते. शहरी जीवनात सहिष्णुता, सहनशीलता एकमेकांबाबत आदर हे गुण अंगी बाणवावे लागतात. शहरे लोकशाहीस चालना देणारी असतात. लोकशाही संकल्पनेचा पाया शहरांनीच घातला आहे. शहरातील संस्कृती बहुभाषिक, बहुधार्मिक असते. शहरामध्ये वेगवेगळे आचार-विचार, वेगवेगळ्या खाद्य संस्कृती एकत्र नांदत असतात. शहरात वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय एकमेकांच्या साहाय्यानेच भरभराटीला येत असतात.

शहरांचे वाढते आकार आणि वाढती लोकसंख्या ही शहरांना लोकांनी दिलेली पसंती दर्शवतात. शहरांच्या विस्ताराला आवर घालणे आजवर कोणालाही जमलेले नाही. येणाऱ्या काळात जमेल असेही वाटत नाही. वाढत्या लोकसंख्येचा आणि तंत्रज्ञानाचा विचार करता, शहरीकरण अटळ आहे हे आता स्पष्ट झाले आहे आणि त्यामुळे ते समजून घेण्यात शहाणपण आहे.

शहर नियोजन आणि शहर विकास ही मोठी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. हा गुंता समजून घेऊ शकतील, त्याची उत्तरे शोधू शकतील अशा कल्पक, बुद्धिमान आणि ध्येयनिष्ठ नगरसेवकांची शहरांना गरज आहे. नागरी जीवनाची गुणवत्ता आणि नागरी नेतृत्वाची कल्पकता, यांचा जवळचा संबंध आहे. ‘नगरसेवक, दैनंदिन नागरी जीवनाच्या समस्यांकडे मुकादमाच्या क्षमतेने सोडवू शकतो, की प्रशासकाच्या क्षमतेने सोडवू शकतो?’ हा एक महत्त्वाचा विचार नगरसेवक निवडताना नागरिकांनी करणे गरजेचे आहे. मुकादम हवाय की शहराचा धोरणकर्ता हवाय? नागरी नेतृत्व निवडण्याबाबत आवश्यक ती प्रगल्भता आपल्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये आहे असे वाटत नाही. सक्षम, ध्येयनिष्ठ मनुष्यबळ प्रत्येक शहरात उपलब्ध आहे. पण सत्तेच्या, बडेजावाच्या दांडगाव्यापुढे ते परिघाबाहेरच घुटमळत राहिले आहे. त्यात आपल्या निवडणूक पद्धतीने सततची अस्थिरता निर्माण करून गोंधळात आणखी भर घातली आहे. नागरी जीवनाच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या चळवळींना दोन्ही आघाड्यांवर काम करावे लागणार आहे.

१) सामाजिक प्रबोधन आणि २) कायद्यात बदल.

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने काही विषय ऐरणीवर घेता येतील. नागरी समाज म्हणजे काय? नगरपालिका, महानगरपालिका, या संस्था नेमक्या काय? आहेत? या संस्था कोण चालवू शकते? या संस्था चालवणाऱ्यांची क्षमता आणि नागरी जीवनाची गुणवत्ता यांचा काही संबंध आहे की नाही? या संस्थात विधायक आणि उन्नतीचे राजकारण अशक्य आहे का? गुंड-पुंड, ऐरे-गैरे यांना नेतृत्व करण्याएवढा आत्मविश्वास कशामुळे आला? आरक्षणाची तरतूद, त्यासाठी आलटून पालटून राखीव प्रभाग, यामुळे शहरांना स्थिर, ध्येयनिष्ठ नेतृत्व लाभू शकेल का? भारतीय नागरी समाजाची मानसिकता, ७४ व्या घटना दुरुस्तीची गरज, आणि वास्तव, असे किती तरी विषय या निवडणुकीच्या निमित्ताने ऐरणीवर घेण्यासारखे आहेत.

(लेखक कोल्हापुरातील ज्येष्ठ आर्किटेक्ट व पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत)

(फोटो ग्रंथालयात आहे तो वापरावा)