शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शहरभान-०३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:25 IST

कसलेही नैतिक बंधन नसेल तर महापालिकेची सत्ता हस्तगत करणे ही एक सोईची बाब असते. सत्तेसाठी सोयीस्कर ठरलेला ‘कोल्हापूर ...

कसलेही नैतिक बंधन नसेल तर महापालिकेची सत्ता हस्तगत करणे ही एक सोईची बाब असते. सत्तेसाठी सोयीस्कर ठरलेला ‘कोल्हापूर पॅटर्न’ खरंतर पुरोगामी कोल्हापूरची बदनामी करणारा आहे. माध्यमांकडून अनावधानाने या चुकीच्या पायंड्याचे ‘कोल्हापूर पॅटर्न’ ‘कोल्हापूर पॅटर्न’ म्हणून उदात्तीकरण झाले. विचित्र राजकीय संस्कृती बहरली. अमूक पॅटर्न, तमूक पॅटर्न तसेच अमक्याची सत्ता, तमक्याची सत्ता अशा चिथावणीखोर भाषेमुळे लोकशाहीचे आणि शहराचे खूप नुकसान झाले आहे. माध्यमांनी वार्तांकन करताना लोकशाही समाज व्यवस्थेचे काही संकेत जबाबदारीने पाळणे गरजेचे आहे. त्याचा नागरी जीवनावर परिणाम होत आहे. व्यक्तीस्तोम माजणार नाही, याबाबतची दक्षता घेणे ही माध्यमांची नैतिक जबाबदारी आहे.

शहरांचा सांभाळ आणि विस्तार हा खूप गुंतागुंतीचा विषय आहे. ते कोणा एका राजकीय पुढाऱ्याचे अथवा आयुक्ताचे काम नाही. शहर सांभाळणे हे ध्येयनिष्ठ लोकांच्या टीमचे काम आहे. कोल्हापूरमध्ये कशाचीही कमतरता नाही. ज्ञान असलेले ध्येयनिष्ठ नागरिक आहेत. आर्थिक, नैसर्गिक संपन्नता आहे. प्रगतीसाठी आवश्यक ती शांतता आहे. भारतातील एक आदर्श, आकर्षक शहर बनण्याची कोल्हापूरची क्षमता आहे. ‘सत्ता’ हा शब्द इर्षा वाढवणारा आहे, तेढ निर्माण करणारा आहे, चिथावणीखोर आहे. लोकशाही मूल्यांची हत्या करणारा आहे. निवडणुका सत्ताधीश निवडण्यासाठी असतात की प्रतिनिधी...? आपली लोकशाही प्रातिनिधिक आहे. ‘निवडणूक’ हे लोकांना आपला प्रतिनिधी निवडण्याचे साधन आहे. मोठी संख्या असलेल्या संस्थांच्या निर्णय प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाने सहभागी होणे अथवा त्याला सहभागी करून घेणे शक्य होत नसते. यासाठी लोक आपला सुयोग्य प्रतिनिधी निवडतात आणि या प्रतिनिधीमार्फत आपल्या संस्था चालवतात. हा एक लोकशाही व्यवस्थेमधील व्यवहार्य पर्याय असतो. मात्र, प्रतिनिधींच्या डोक्यात सामूहिक जबाबदारीच्या ऐवजी सत्तेचीच हवा कशी काय घुसते...? ती घुसू नये, याबाबत लोकांची जागरुकता आणि माध्यमांचा सततचा अंकुश गरजेचा आहे.

नगरपालिका, महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘सत्ता’ या शब्दाने फार उग्र आणि कर्कश रूप धारण केले आहे. नगरसेवक व्हायचं ते सत्तेसाठी आणि बडेजावासाठीच, अशी धारणा समाजात दृढ होत चालली आहे. नगरसेवकांचा रुबाब, बडेजाव, नेतेगिरी हा छचोरपणा आहे. यामुळे सुज्ञ, सभ्य नागरी समूह या दर्जाहीन राजकीय प्रवाहापासून अंतर ठेवू लागला आहे. परिणामत: गुंड-पुंड यांना मोकळे रान मिळत चालले आहे. हे कुठं तरी थांबलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. हे राजकीय प्रदूषण थांबविण्यासाठी कोल्हापूरनेच पुढाकार घेतला पाहिजे. हे बळ कोल्हापूरमध्ये आहे. पालिकांच्या राजकारणाचा दर्जा सुधारला की, आपोआप शहराचे आरोग्य, शहराची भाषा, शहराची सभ्यता, शहराचे सौंदर्य, महिलांचे स्वास्थ्य, बुजुर्गांचे स्वास्थ्य हे सगळं सुधारायला सुरुवात होणार आहे. पालिका सभागृह कोणकोण चालवतात, त्याच्यावर नागरी जीवनाची गुणवत्ता अवलंबून आहे. माध्यमांनी नागरी संस्थांची सामाजिक गरज, शहर नियोजन, शहर विकास यांची आव्हाने, गुंतागुंत समजून घ्यावी. लोकशाहीचे पावित्र्य, अब्रू जपण्यासाठी काहीवेळा सत्तेचा त्याग करावा लागतो. लोकशाहीचे पावित्र्य जपण्याची नैतिक जबाबदारी राजकीय नेत्यांची आणि माध्यमांची जादा आहे.

समाजाच्या सर्व लोक व्यवहारांमध्ये शासनाने सहभाग देणे, हस्तक्षेप करणे योग्य नाही. भारतासारख्या लोकसंख्येने आणि आकारानेही मोठ्या तसेच विभिन्न संस्कृतीच्या देशात तर ते अगदीच अयोग्य. जास्तीत जास्त लोक व्यवहार नागरिकांनी स्वत:च्या नागरी संस्थांच्या (महापालिका, नगरपालिका)मार्फत प्रामाणिकपणे आणि कल्पकतेने चालवलेत तर ते नागरिकांच्या श्रेयस्कर शिवाय शासनालाही सोयीस्कर आहे. सर्व तऱ्हेच्या नागरी व्यवहारांची जबाबदारी पेलणे, शासनाला शक्य नसते. म्हणून स्थानिक व्यवहारांची जबाबदारी नागरिकांनी घेतलीच पाहिजे. ही झाली एक बाजू. शासन सर्व व्यवहारांची जबाबदारी घेऊ पाहिलं, तेव्हा आपोआपच शासनाची हुकुमशाही प्रवृत्ती आणि अधिकार दोन्ही वाढतील, ही झाली दुसरी बाजू.