शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांना सुरुवातीपासूनच ‘गोकूळ’ची निवडणूक नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशाने सहकारी निवडणूक प्राधिकरणाने ‘गोकूळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरू केली. आता कोरोनाचा संसर्ग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशाने सहकारी निवडणूक प्राधिकरणाने ‘गोकूळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरू केली. आता कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, याबाबत उद्या, सोमवारी सर्वेाच्च न्यायालयात निवडणुकीबाबत सुनावणी आहे, आता न्यायालयच निर्णय घेईल. मात्र एक नक्की आहे, सत्तारूढ गटाला ‘गोकूळ’ची निवडणूकच नको असल्याचा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी हाणला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात रोज तीनशे-चारशे रुग्ण कोरोनाबाधित सापडत आहेत. अशा वातावरणात ‘गोकूळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यात, ‘गोकूळ’चे वीस ठरावधारक कोरोनाबाधित असून शनिवारी शाहूवाडी तालुक्यातील एका ठरावधारकाचा मृत्यू झाला. याबाबत मंत्री पाटील यांना विचारले असता, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच ही निवडणूक सुरू आहे. सत्तारूढ गटाला निवडणूक नको आहे, यासाठी ते सहा वेळा उच्च न्यायालयात गेले. आता ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, ही वस्तुस्थिती आहे, मात्र निवडणुकीबाबत आता सर्वोच्च न्यायालयच निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.

सत्तारूढ गटाचे चार-पाच जण संपर्कात

माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी आमदार पी.एन. पाटील यांची भेट घेतल्याबाबत विचारले असता, इकडे तिकडे होत असते. सत्तारूढ गटाचे चार-पाच जण आमच्या संपर्कात आहेत. बुधवारी (दि. २१) कोण कोणाकडे आहे, याचे चित्र तुमच्यासमोर येईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.