शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

मैदान संपलेलं नाही, ही तर सुरुवात; मग्रुरीच्या भाषा सहन करणार नाहीत, अमल महाडिक यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 11:55 AM

मुळात ज्यांना लोकशाही प्रक्रियाच मान्य नाही, असे लोक लोकशाहीचा आग्रह धरतात हा मोठा विनोद

कोल्हापूर : राजाराम कारखाना निवडणूक छाननीत निवडणूक यंत्रणेने पोटनियमानुसारच अर्ज अपात्र ठरवले, मात्र विरोधकांनी यंत्रणेवरच आक्षेप घेतला. त्यातून ते मग्रुरीची भाषा वापरत असून ‘राजाराम’चे सभासद अशी भाषा सहन करणार नाहीत, मैदान अद्याप संपलेले नाही, ही तर सुरुवात आहे, असा इशारा माजी आमदार अमल महाडिक यांनी पत्रकातून दिला. कारखान्याच्या १८९९ सभासदांना अपात्र ठरवताना तुमची ही भावना कोठे गेली होती? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहेत.कारखान्याच्या पोटनियमानुसार २९ लोकांचे अर्ज अपात्र ठरल्यानंतर विरोधकांचा जळफळाट होत आहे, मात्र १८९९ सभासदांना त्यांनी अपात्र ठरवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र त्यांची ही आपुलकीची भावना जागी झाली नाही. मुळात ज्यांना लोकशाही प्रक्रियाच मान्य नाही, असे लोक लोकशाहीचा आग्रह धरतात हा मोठा विनोद आहे. एवढ्यावर मैदान संपलेलं नाही, ही आता फक्त सुरुवात आहे. मग आताच एवढा आकांडतांडव कशाला?

विरोधी आघाडीतील हे २९ वगळता इतर उमेदवारांना घेऊन त्यांनी सक्षम पॅनल बनवावं, आम्ही आधीपासूनच मैदान लढवायला तयार आहोत. अर्ज अपात्र ठरवले म्हणून रागाने धमक्या व मग्रुरीची भाषा वापरत आहेत, मात्र हे सहन करायला हा काय डी. वाय. पाटील कारखाना नाही.मानेंनी रडत बसण्यापेक्षा खबरदारी का घेतली नाहीसर्जेराव माने यांनी ‘राजाराम’चे अध्यक्ष म्हणून काम केल्याने त्यांनी अनेक वेळा पोटनियमांचा अभ्यास केला आहे. अर्ज अपात्र ठरल्यानंतर रडत बसण्यापेक्षा अगोदरच खबरदारी का घेतली नाही? असा सवालही महाडिक यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकAmal Mahadikअमल महाडिकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील