शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

राजाराम कारखाना निवडणूक: को-जनरेशनद्वारे जादा ऊस दर, रोजगारही देणार; अमल महाडिक यांचा ‘शब्द’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 11:46 IST

महादेवराव महाडिक हे ‘शब्द’ पाळणारे नेतृत्व आहे हे कोल्हापूर जिल्हा गेली ४० वर्षे पाहत आला आहे.

कोल्हापूर : छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या ज्या सभासदांनी गेली २८ वर्षे महादेवराव महाडिक यांच्यावर विश्वास ठेवला आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. उलट येत्या पाच वर्षांत को जनरेशन प्रकल्प राबवून उत्पादकांना जादा दर देण्याबरोबरच वाढीव रोजगारही देणार असल्याचा ‘शब्द’ माजी आमदार अमल महाडिक यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतीमध्ये दिला. यापुढच्या काळात आधुनिकीकरणाच्या माध्यमातून १२२ गावांमधील शेतकऱ्यांना अधिकाधिक दर देणार असल्याचे सांगत त्यांनी त्याचा आराखडाच मांडला.

ते म्हणाले, विरोधकांनी जे प्रश्न विचारले त्याची उत्तरे आम्ही जाहीरपणे दिली. परंतु आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी अजूनही दिलेली नाहीत. १२२ गावांतील सभासद शेतकऱ्यांचा हा कारखाना केवळ वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी त्यांना कसबा बावड्यापुरताच करायचा आहे पण हे कदापिही होऊ देणार नाही.प्रश्न : विरोधकांचे अर्ज अपात्र झाले. परंतु तुमच्यावर का आरोप होत आहेत?उत्तर : विरोधकांचे अर्ज आम्ही अपात्र करण्याचा प्रश्नच नाही. प्रशासकीय यंत्रणेने कारखान्याच्या पोटनियमांनुसार अर्ज अपात्र ठरवले. त्याही पुढे जावून उच्च न्यायालयाने त्यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब केले. न्यायदेवतेसमोर सर्वजण समान आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोपांना काहीही अर्थ उरत नाही.

प्रश्न : कारखान्याच्या विस्तारीकरणाला विलंब का झाला ?उत्तर : मुळात हा कारखाना शहरी भागात आहे. नदीपासून हाकेच्या अंतरावर आहे. यासाठी काही पर्यावरणाच्या अटी आहेत का किंवा एकूणच कारखान्याच्या आणि सभोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास करून आणि सगळ्यात महत्त्वाचे सभासदांना विश्वासात घेऊन याबाबत निर्णय घेण्याची गरज होती तसा सर्वसाधारण सभेत विषय मांडून २०१८/१९ साली को-जनरेशनसाठी आम्ही ठराव केला. त्यासाठी शासनाची परवानगी घेतली आहे. कोरोनामुळे हे काम सुरू करता आले नाही. कोरोनाची लाट आली नसती तर आतापर्यंत को- जनरेशन प्रकल्प पूर्णही झाला असता.प्रश्न : तुम्ही दरात नुकसान करताय असा आरोप होतोय?उत्तर : पूरग्रस्त आणि अतिवृष्टीच्या परिसरातील गावांचा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात समावेश आहे. हा सर्व ऊस सरसकट उचलला जातो तसेच सध्याची कारखान्याची यंत्रणा जुनी आहे. त्यावरच आवश्यक दुरूस्ती करत २२०० टनांपासून ३५०० टनांपर्यंत कारखान्याची क्षमता वाढविण्यात आली. आता कारखान्याची मशिनरीही बदलावी लागणार आहे. ५ हजार टनाची क्षमता केल्यानंतर निश्चितच मोठ्या कारखान्यांप्रमाणे दर देण्यास आम्ही बांधील आहोत.

शेतकऱ्यांना त्रास न होता ऊसतोडएकतर कोणत्याही कारखान्याकडे नसेल एवढे मोठे कार्यक्षेत्र छत्रपती राजाराम कारखान्याचे आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागातील अनेक गावे आहेत; परंतु अशाही भागातील सर्वच्या सर्व ऊस आपण तोड करतो. त्यामध्ये कुठेही शेतकऱ्याला त्रास न होता ही तोड दिली जात हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्याचा आमच्यावर विश्वास आहे.

निवडणूक लादलीसतेज पाटील हे ‘शब्द’ पाळणारे नाहीत याचा अनुभव आम्ही गेली अनेक वर्षे घेत आलो आहोत. त्यावर आमदार विनय कोरे यांनी दोनच दिवसांपूर्वी कुंभोजच्या जाहीर सभेत शिक्कामोर्तब केले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी केवळ आणि केवळ भाजप पक्षाचा आदेश म्हणून आम्ही थांबलो. परंतु त्यासाठी आम्ही कोणत्याही अटी घातल्या नव्हत्या. वरिष्ठ नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाली परंतु तो ‘शब्द’ त्यांनी पाळला नाही. महादेवराव महाडिक हे ‘शब्द’ पाळणारे नेतृत्व आहे हे कोल्हापूर जिल्हा गेली ४० वर्षे पाहत आला आहे.

राजाराम महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय आधीचछत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय आधीच झाला आहे. फक्त विस्तारीकरणावेळी जागेच्या काही अडचणी येऊ नयेत म्हणून अजून पुतळा उभारलेला नाही. जेव्हा विस्तारीकरण आणि को- जनरेशनच्या जागेचा निर्णय होईल तेव्हा पुतळ्याची जागा निश्चित करून तो उभारला जाणार आहे.

मग इतकी वर्षे आमच्यावर विश्वास का?गेली २८ वर्षे महादेवराव महाडिक यांच्यावर सभासदांनी विश्वास ठेवला कारण आम्ही डी. वाय. पाटील कारखान्यासारखे एका रात्रीत सभासदांना काढून टाकले नाही. सभासदांविषयी आत्मीयता असल्यानेच कारखान्याची सत्ता आमच्याकडे राहिली.हे आम्ही आधीच केले आहे

  • कामगारांचा विमा, पीएफ, प्रमोशन सर्व काही सुरळीतपणे सुरू आहे.
  • माती परीक्षणाचे कामही सुरू असते.
  • नवी स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत.
  • प्रशासकीय इमारतीचे काम लवकर पूर्ण होणार आहे.
  • ऊस उतरला की संबंधित शेतकऱ्याच्या मोबाईलवर राजाराम ॲपच्या माध्यमातून मेसेज जातो.
  • पाणंद विकास योजनेच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये काम झाले आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकAmal Mahadikअमल महाडिक