शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा चटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
3
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
4
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
5
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
6
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
7
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
8
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
9
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
10
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
11
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
12
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
13
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
14
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
15
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
16
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
17
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
18
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
19
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
20
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे ६० टक्के व्यवसायांना फटका-खरेदीच्या उत्साहावर पाणी, फेरीवाल्यांची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 11:53 IST

दिवाळीला एक दिवस बाकी असताना अपेक्षित व्यवसाय होत नसल्यामुळे व्यापारी, फेरीवाले कर्जाच्या खाईत लोटले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमुसळधार पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने त्यांचे कंबरडे मोडले आहे.

कोल्हापूर : महापुरातून सावरत असणाऱ्या व्यापारी, फेरीवाल्यांचे परतीच्या पावसामुळे पुन्हा कंबरडे मोडले आहे. ऐन दिवाळीच्या हंगामामध्येच सलग चार दिवस पडणाºया पावसाने किरकोळ विक्रेत्यांसह बड्या व्यापाऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ६० टक्के व्यवसायावर परिणाम झाला असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. यामध्ये राजारामपुरी, शाहूपुरीबरोबरच महाद्वार रोड, ताराबाई रोड आणि पापाची तिकटी येथील विक्रेत्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

अरबी समुद्रामध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तसेच चक्रीवादळामुळे कोल्हापुरात पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. परतीच्या पावसाचा फटका ज्याप्रमाणे शेतक-यांना बसत आहे, त्याप्रमाणेच शहरी भागातील किरकोळ, घाऊक विक्रेत्यांनाही बसत आहे. ऐन दिवाळीवेळीच कोसळणा-या पावसामुळे व्यापा-यांबरोबरच फेरीवाले हवालदिल झाले आहेत. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या महापुरामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. दिवाळीमध्ये यामधील काहीअंशी तोटा भरून निघेल, अशी त्यांना अपेक्षा होती; परंतु मुसळधार पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने त्यांचे कंबरडे मोडले आहे. दिवाळीला एक दिवस बाकी असताना अपेक्षित व्यवसाय होत नसल्यामुळे व्यापारी, फेरीवाले कर्जाच्या खाईत लोटले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पत्र्याचे शेड मारण्याची वेळ
दरवेळी दिवाळीमध्ये महाद्वार रोडवरील विके्रते दुकानाबाहेर मंडप घालतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानाला आकर्षक सजावटीसोबत विद्युत रोषणाईही केली जाते. मात्र, दिवसरात्र सुरू असलेल्या पावसामुळे विक्रीसाठी आणलेला माल भिजत आहे. यावर पर्याय म्हणून काहींनी मंडपावर पत्र्याची शेड उभारली आहेत.

 

फायद्यापेक्षा तोटाच जास्त
दिवाळीच्या अगोदर पाच दिवस ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडतात. या कालावधीत दरवर्षी दररोज १० हजारांचा गल्ला जमा होत असे. यावेळी पावसामुळे ग्राहकांची संख्या कमी झाल्याने दोन हजार रुपयेही व्यवसाय होत नाही. महापुरात सलग १५ दिवस व्यवसाय बंद ठेवावा लागला. दिवाळीसाठी कर्ज काढून माल आणला आहे. अपेक्षित उठाव होत नसल्यामुळे फायद्यापेक्षा तोटा जास्त होत आहे.
- एकनाथ लक्ष्मण पाटील, फेरीवाले, महाद्वार रोड
 

 

६० टक्के व्यवसायाला फटका
शहरामध्ये अगोदरच स्पर्धा आहे. तसेच दिवाळीच्या खरेदीसाठी कोल्हापूरकर मोठ्या संख्येने गांधीनगरला जात आहेत. यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. अशी बिकट परिस्थिती असतानाच ऐन हंगामावेळी पावसाने हजेरी लावल्याने दरवर्षीच्या तुलनेत ६० टक्के व्यवसायावर परिणाम झाला आहे.
- अरविंद भेदा, टॉप अँड टाऊन
 

 

दिवाळीतील खप घटला
दरवर्षी दिवाळीला काही पैसे हातात पडतील, या आशेने महाद्वार रोड येथे व्यापारासाठी येतो. यंदाच्या वेळी पावसामुळे ग्राहक स्टॉलच्या ठिकाणी थांबायलाच तयार नाहीत. दरवर्षीच्या तुलनेत १० टक्केही व्यवसाय होत नाही. याचा खपावर परिणाम झाला आहे. दिवाळीसाठी एक दिवसाचा अवधी बाकी असून, या दिवसात खरेदी केलेला सर्व माल खपेल याची शाश्वती नाही.
- राजेंद्र धर्मराज पांढरे, फेरीवाले
 

 

हंगाम तोट्यात जाणार
पावसामुळे दरवर्षीच्या तुलनेत ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्याचबरोबर महापुराचा परिणामही व्यवसायावर होत आहे. दरवेळी दोन हजारांची खरेदी करणारा ग्राहक एक हजाराचीच खरेदी करीत आहे. गतवर्षीच्या तुलनेत ४० टक्केही व्यवसाय झालेला नाही. परिणामी हंगाम तोट्यात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
- मेघा इंगवले, गुरुकृपा कलेक्शन, ताराबाई रोड
 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbusinessव्यवसायRainपाऊस