शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

corona virus-राधानगरी, सागरेश्वर अभयारण्य मार्चअखेर राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 2:41 PM

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या साथरोग प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राधानगरी आणि सागरेश्वर हे दोन्ही अभयारण्ये मार्चअखेर बंद ठेवण्याचा निर्णय वनखात्याने घेतला आहे. यासंदर्भातील अधिसूचना वन्यजीवचे विभागीय वनअधिकारी विजय खेडकर यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

ठळक मुद्देराधानगरी, सागरेश्वर अभयारण्य मार्चअखेर राहणार बंदवनखात्याचा निर्णय : कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी प्रतिबंध

कोल्हापूर : राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या साथरोग प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राधानगरी आणि सागरेश्वर हे दोन्ही अभयारण्ये मार्चअखेर बंद ठेवण्याचा निर्णय वनखात्याने घेतला आहे. यासंदर्भातील अधिसूचना वन्यजीवचे विभागीय वनअधिकारी विजय खेडकर यांनी प्रसिध्दीस दिली आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी काढलेल्या आदेशानसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात १३ मार्च रोजी लागू झालेल्या साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार दि. ३१ मार्च अखेर पर्यटन केंद्रही बंद ठेवण्याचे आदेश जारी केल्यामुळे राधानगरी आणि सागरेश्वर हे दोन्ही अभयारण्ये दि. १७ मार्चपासून ३१ मार्चअखेर बंद ठेवण्यात येणार आहेत.कोल्हापूर वन्यजीव विभागाचे विभागीय वनअधिकारी विजय खेडकर यांनी यासंदर्भात वनविभागाच्या सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या वनपरिक्षेत्रातील परिमंडळ क्षेत्रात राहून जंगल हद्दीत कोणताही पर्यटक पर्यटनासाठी येणार नाही, याची दक्षता घ्यावी असे कळविले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पर्यटकांनीही अभयारण्यास भेट देण्याचे टाळावे, असे आवाहन विजय खेडकर यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाradhanagari-acराधानगरीkolhapurकोल्हापूर