शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
2
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
4
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
5
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
6
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
7
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
8
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
9
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
10
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
11
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
12
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
13
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
14
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
15
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
16
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
17
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
18
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
19
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
20
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंबाला आले सुगीचे दिवस.... शासनाने मारले, ‘लोकमत’ने तारले !

By admin | Updated: January 17, 2015 00:07 IST

आटपाडीत दर तेजीत : खरेदीसाठी राज्याबाहेरील शंभरावर व्यापारी दाखल

अविनाश बाड -आटपाडी   दोन-तीन दिवसांपासून आटपाडीत डाळींब खरेदीसाठी देशभरातून व्यापाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होऊन त्यांची संख्या शंभरावर गेली आहे. प्रथमच व्यापारी विक्रमी संख्येने एकाचवेळी दाखल झाल्याने डाळिंबाला पुन्हा तेजीचे दिवस आले. फुटलेली डाळिंबे कचऱ्यात फेकून देण्याऐवजी आता ती मुंबईच्या फूटपाथवर दिसणार आहेत.
नाशिक, पुणे, बारामतीच्या ज्युस व्यापाऱ्यांनीही एकाच दिवसात फुटकी चार ट्रक डाळिंबे प्रथमच आटपाडीतून खरेदी केली आहेत. त्यामुळे डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना आता कोट्यवधी रुपयांचा फायदा होणार आहे. पिढ्यान्पिढ्यांच्या दुष्काळावर मात करून आणि कष्टाच्या जोरावर शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार डाळिंबांची निर्मिती केली. पण, केंद्र शासनाने निर्यातीवर जाचक अटी लादल्याचे आणि थंडीचे कारण पुढे करून व्यापाऱ्यांनी डाळिंबाचे दर पाडले होते. आतापर्यंत अवघे २० ते २५ व्यापारीच आटपाडीत डाळिंबाची खरेदी करत होते. डाळिंबाचा ‘भगवा’ वाण ४० ते ५० रुपयांपर्यंत विकला जात होता.
‘लोकमत’ने दि. ५ जानेवारीपासून डाळिंबाच्या कमी दरासह शेतकऱ्यांचे दुखणे मांडले. परिणामी, जिल्ह्यातील अडतदारांनी देशभरातील व्यापाऱ्यांशी संपर्क साधून आटपाडीतील डाळिंबाची आवक आणि आताचे खरेदी दर सांगितले. त्यामुळे सध्या पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, दिल्ली, मुंबई, मदुराई, चेन्नई, मद्रास, लखनौ आणि कर्नाटकातून १०० हून अधिक व्यापारी खरेदीसाठी आले आहेत. त्यामुळे ५० रुपयांपर्यंत विकला जाणारा ‘भगवा’ वाण आता ८३ रुपये किलोपर्यंत गेला आहे. गत आठवड्यात १५ ते २५ रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या ‘गणेश’ या वाणाची डाळिंबे आता २५ ते ४० रुपये दराने विकली जात आहेत. फूटपाथवर विक्री करण्यासाठी मुंबईहून प्रथमच येथे आलेले व्यापारी ही उलकी डाळिंबे २५० ते ४०० रुपये प्रतिक्रेट दराने खरेदी करू लागले आहेत. जेजुरी, नाशिक, बारामती येथील ज्युस उत्पादकांनी आटपाडीत येऊन ‘ज्युस’ निर्मितीसाठी ५० रुपये ते ५०० रुपये क्रेट या दराने उलकी डाळिंबे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. सुमारे २० टन डाळिंबे एका दिवसात विकली गेली आहेत. त्यातून शेतकऱ्यांना सुमारे चार लाख रुपये मिळतील. डाळिंबांची खरेदी करण्यासाठी परराज्यातील व्यापारी दलाल नेमू लागले आहेत. आठ-पंधरा दिवसांत डाळिंबांचे दर पुन्हा शंभरावर जाण्याची शक्यता अडतदारांनी व्यक्त केली.

ऐन हंगामात अन्न आणि औषध प्रशासनाने अनारदाना आणि ज्युस उद्योगांवर छापे टाकून ते उद्योग बंद पाडले. त्यामुळे आटपाडीत शेतकऱ्यांना लाखो रुपयांची डाळिंबे कचऱ्यात फेकून द्यावी लागत होती. ‘लोकमत’ने याबाबत वारंवार सडेतोड वृत्त दिले. त्याची व्यापाऱ्यांसह संबंधित व्यावसायिकांमध्ये जोरदार चर्चा झाली. त्यामुळे प्रथमच आटपाडीत चार-पाच व्यावसायिकांनी फुटलेली डाळिंब खरेदी करण्यास सुरुवात केली. आटपाडीच्या डाळींब व्यापारी अडत संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ नागणे, अडतदार विठ्ठल सरगर आणि अडतदारांनी याबाबत ‘लोकमत’चे अभिनंदन केले.