शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कुरघोडीचे राजकारण उफाळले

By admin | Updated: February 26, 2015 00:13 IST

राष्ट्रवादीला गटबाजीचे ग्रहण : जांभळे-माने गटाची मुंबईला धाव; राजकीय क्षेत्रात उत्सुकता

राजाराम पाटील - इचलकरंजी -येथील राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील गटबाजी विकोपाला गेली असून, परस्परांवर कुरघोड्यांचे राजकारण उफाळून आले आहे. गटबाजीमुळे पोखरलेली राष्ट्रवादी कॉँग्रेस अधिकच क्षीण होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीतील जांभळे-माने गटाने पक्षनेतृत्वाकडे धाव घेतली असून याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.इचलकरंजी शहरातील राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये सुरूवातीपासूनच गटबाजीचे राजकारण आहे. राजकीय घडामोडी किंवा प्रसंगानुरूप ही गटबाजी डोके वर काढते. मात्र, कालांतराने त्यावर पडदा पडतो. अशा पार्श्वभूमीवर सन २०११ मध्ये नगरपालिकेची झालेली सार्वत्रिक निवडणूक राष्ट्रवादी कॉँग्रेसने स्वतंत्ररित्या लढवली. त्यामुळे पालिकेत प्रथमच राष्ट्रवादी कॉँग्रेस, राष्ट्रीय कॉँग्रेस व विकास आघाडी अशी तिरंगी लढत झाली. निवडणुकीमध्ये राष्ट्रीय कॉँग्रेसचे ३०, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे १० व शहर विकास आघाडीचे १७ नगरसेवक निवडून आले. सत्ता स्थापन करताना दोन्ही कॉँग्रेसने एकत्रित येऊन आघाडी केली. सुरूवातीला नगरपालिकेतील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कामकाज सुरळीतपणे सुरू होते. पक्षप्रतोदपदी रवींद्र माने यांची निवड झाली होती. सन २०१३ मध्ये नितीन जांभळे बांधकाम समितीचे सभापती झाले असताना त्यांचे वडील व स्वीकृत नगरसेवक अशोकराव जांभळे यांनी पालिकेच्या कामकाजात लक्ष देण्यास सुरूवात केली. त्यामुळे जांभळे यांचेही आणखीन एक वेगळे सत्ता स्थान नगरपालिकेत निर्माण झाले.दरम्यान, २०१४ च्या सुरूवातीला प्रभाग क्रमांक ३ मधील कॉँग्रेसचे नगरसेवक जहॉँगीर पटेकरी यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्याने पटेकरी यांचे नगरसेवकपद रद्द झाले. आणि त्याठिकाणी पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीमध्ये आघाडी असली तरी राष्ट्रीय कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्यात सरळ लढत झाली. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून विठ्ठल चोपडे निवडून आले. या निवडणुकीत विठ्ठल चोपडे यांना शहर विकास आघाडीने मदत केली. परिणामी निवडून आल्यानंतर विठ्ठल चोपडे शहर विकास आघाडीच्या संगतीत राहिले.नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या पदाची मुदत संपूनसुद्धा त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. त्यांच्या बंडास शहर विकास आघाडी आणि चोपडे यांच्या बरोबरीने त्यांच्या कारंडे गटाने पाठिंबा दिला. याचा परिणाम म्हणून नगरपालिकेतील कॉँग्रेसच्या आघाडीचे वर्चस्व संपुष्टात आले. नगराध्यक्षा बिरंजे यांना दिलेला कारंडे गटाचा पाठिंबा पक्षप्रतोद माने व जांभळे यांना अस्वस्थ करीत राहिला. चोपडे यांचे पालिकेच्या राजकारणातील वर्चस्व वाढत राहिले. त्यातूनच पुन्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली. चोपडे यांचे अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठी पक्षप्रतोद माने व जांभळे यांनी आयोजित केलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत, चोपडे हे पक्ष विरोधी कारवाया करतात. म्हणून त्यांचे तात्पुरते निलंबन करावे, अशा आशयाचा प्रस्ताव पारीत करण्यात आला; पण कारंडे गटाने माने-जांभळे गटाच्या कुरघोडीवर मात करीत प्रदेश कार्यकारिणीकडून माने यांच्याच निलंबनाचे आदेश मिळविले. त्याचबरोबर पक्षप्रतोद म्हणून चोपडे यांची निवड झाल्याचे जिल्हा कॉँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी जाहीर केले. तर माने यांचे निलंबन तात्पुरते रद्द ठेवल्याची माहिती राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षा निवेदिता माने यांनी पत्रकारांना दिली.