शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी घेतला सुटकेचा नि:श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:28 IST

चौकट - रेस्क्यू फोर्सचे १५० जवान तैनात स्वाभिमानीच्या जलसमाधी मोर्चात कार्यकर्ते नदीत उडी घेतल्यास त्यांना वाचविण्यासाठी तालुका प्रशासनाने पंचगंगा ...

चौकट - रेस्क्यू फोर्सचे १५० जवान तैनात स्वाभिमानीच्या जलसमाधी मोर्चात कार्यकर्ते नदीत उडी घेतल्यास त्यांना वाचविण्यासाठी तालुका प्रशासनाने पंचगंगा व कृष्णा नदीपात्रात सहा यांत्रिक बोटीसह रेस्क्यू फोर्सच्या जवानांना तैनात केले होते. यामध्ये वजीर रेस्क्यू, पास रेस्क्यू व आधार रेस्क्यू फोर्सचे सुमारे दीडशे जवान नदीपात्रात तैनात होते.

गावागावातून जेवणाची सोय

मोर्चाचे हेरवाड (ता. शिरोळ) येथे दुपारच्या जेवणाचे ग्रामस्थ व स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी नियोजन केले होते. सुमारे तीन हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. त्यासाठी गावागावातून लोकांनी भाकरी, भाजी, भात आणला होता.

चौकट -

कुरुंदवाड-नृसिंहवाडी पुलावर कडक बंदोबस्त

आंदोलक जलसमाधीसाठी पुलावरून उडी मारू नये यासाठी पोलीस प्रशासनाने पंचगंगा नदीवरील दिनकरराव यादव पुलावर दोन्ही बाजूस पावला पावलावर पोलीस तैनात केले होते. शिवाय पोलिसांनी रस्सी धरून एकही आंदोलक पुलाच्या कठड्याकडे येणार नाही याची दक्षता घेतली होती. पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे एका शेतकऱ्याने लघुशंकेचा बहाणा करून पोलिसांना चकवा देत थेट नदीत उडी मारली. पोलिसांनी त्या कार्यकर्त्याचा पाठलाग केला. मात्र, त्याला अडविण्यात यश आले नाही. त्यामुळे या घटनेची आंदोलन ठिकाणी चांगलीच चर्चा रंगली होती.

दोघा कार्यकर्त्यांची पंचगंगा नदीत उडी

मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही धनंजय टारे (रा. आळते, ता. शिरोळ) व बाहुबली सारपे (रा. सरकुला, ता. पंढरपूर) अशा दोन शेतकऱ्यांनी कुरुंदवाड-नृसिंहवाडी रस्त्यावरील पंचगंगा नदीवरील दिनकरराव यादव पुलावरून नदीपात्रात उडी घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी नदीपात्रात प्रशासनाने तैनात केलेल्या यांत्रिक बोटीवरील रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी त्यांना वाचविण्यात आले. मात्र, या घटनेने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. शिवाय पोलिसांवर मोठा ताण आला होता.

चौकट - राजू शेट्टींकडून नाराजी व्यक्त

मोर्चा नृसिंहवाडीत पोहोचण्यापूर्वी दोन शेतकऱ्यांनी पंचगंगा नदीत उडी घेतल्याचे समजताच राजू शेट्टी यांनी अतिउत्साही कार्यकर्त्यांवर भर सभेतच नाराजी व्यक्त केली. स्वाभिमानीच्या आंदोलनाला शिस्त आहे. कोणताही कार्यकर्ता मनाला येईल तसे वागून चालत नाही. कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालून मी आंदोलन करत नाही. जलसमाधीची घोषणा मी केली आहे. शासन सकारात्मक निर्णयापर्यंत आले आहे. त्याच्या प्रस्तावाचा सर्वानी निर्णय घेऊन जलसमाधी घ्यावयाचे असेल तर प्रथम मी घेईन. मात्र, येथून पुढे संघटनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याने आगाऊपणा करावयाचे नाही, असे शेट्टी यांनी खडसावले.