शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे रुपयांसाठी काढावे लागते दीड हजाराचे बँक खाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:16 IST

कोल्हापूर : उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न देता त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार ...

कोल्हापूर : उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न देता त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते काढण्यास सांगितले जात आहे. यामुळे पालकांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया किचकट असल्याने पालकांना त्याचा त्रास होत आहे. मिळणार दीडशे रुपये व त्यासाठी दीड हजार खर्चून बँक खाते काढण्याचे दिव्य पार पाडावे लागत आहे.

पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुट्टीत शालेय पोषण आहार प्रत्यक्ष दिला जात होता; पण यामध्ये बदल करून सरकारने आहाराऐवजी विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार आहे. यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत विद्यार्थ्यांच्या नावे खाते उघडणे बंधनकारक केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या बहुतांशी शाखांमध्ये गर्दी आहे. कोरोनामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या नावे खाते उघडताना पालकांना हेलपाटे मारावे लागत आहे. खात्यासाठी विविध प्रकारची कागदपत्रे गोळा करतानाही धावपळ करावी लागत आहे.

ग्राफ

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी ?

पहिली -५२३८९

दुसरी -५३८८४

तिसरी-५६१६७

चौथी- ५६५६३

पाचवी -५७११८

सहावी -५६७५०

सातवी -५६२५८

आठवी -५७०६५

पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार - १५६

सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार -२३४

चौकट

बँक खाते उघडण्यासाठी लागणार हजार रुपये

शालेय पोषण आहाराऐवजी त्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. ते पैसे कधी मिळणार अनिश्चित आहे. परिणामी आहाराच्या मिळणाऱ्या पैशापेक्षा बँक खाते उघडण्यासाठी पैसे अधिक खर्च होत आहेत. बँकेच्या खात्यावर कमीत कमी एक हजार रुपये नसतील तर दंड आकारला जातो. खाते काढताना दीड हजारांपेक्षा अधिक खर्च होतोच. शिवाय पुढे खाते चालू ठेवण्यासाठी एक हजारांपेक्षा अधिक रक्कम शिल्लक ठेवावे लागणार आहे. यामुळे गरीब, सामान्य पालकांची आर्थिक कोंडी होत आहे.

पालकांची डोकेदुखी दोन पालकांच्या प्रतिक्रिया

कोट

सरकारकडून शालेय पोषण आहारासाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर नाममात्र पैसे जमा करणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते काढण्यासाठी एक हजार रुपये आणि इतर खर्च येत आहे. यामुळे पालकांची नवी डोकेदुखी बनली आहे.

-विजय दिवाण, पालक

माझी मुलगी आठवीला आहे. तिला पोषण आहाराचे पैसे मिळणार म्हणून बँकेत खाते काढण्यास सांगितले. प्रत्यक्षात अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. खाते उघडण्याची प्रक्रिया किचकट होती. यामुळे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडताना त्रास झाला.

-दिलदार मुजावर, पालक

शिक्षणाधिकाऱ्यांचा कोट

सरकार उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न देता त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

-एस. के. यादव, शिक्षण प्रशासन अधिकारी, महापालिका