शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगराव तलाव क्षेत्रात पक्ष्यांची संख्या घटली

By admin | Updated: October 21, 2015 00:10 IST

वनमित्र संस्थेची पाहणी : पाणीपातळी घटल्याचा परिणाम, जैव विविधतेवरही परिणाम

कागल : कागलच्या ऐतिहासिक जयसिंगराव तलावातील पाणी पातळी कमी होण्याचे प्रमाण गेले तीन-चार वर्षे कायम आहे. पाणी पातळी कमी होण्याची विविध कारणे असून, त्याचे परिणामही जाणवत आहेत. पाणी पातळी कमी झाल्याने तलाव क्षेत्रातील जैवविविधतेवरही परिणाम होत असून, या तलाव क्षेत्रात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येतही घट होत आहे. येथील वनमित्र संस्थेने वन्यजीव सप्ताहादरम्यान केलेल्या निरीक्षणामध्ये ही बाब समोर आली आहे. गडकोट स्वच्छता मोहीम, निसर्ग संवर्धन, वन्यजीव संरक्षण अशा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वनमित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गेली सात वर्षे या जयसिंगराव तलावाच्या क्षेत्रातील जैवविविधतेचा अभ्यास सुरू ठेवला आहे. त्यांनी साधारणत: तलावाच्या पाण्यात राहणारे आणि तलावाच्या भोवती असणाऱ्या जंगल-वृक्ष क्षेत्रात राहणारे पक्षी आणि दरवर्षी स्थलांतर करून येणारे परदेशी पाहुणे पक्षी यांची यादी तयार केली आहे. जून ते डिसेंबर या कालावधीत स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य या ठिकाणी असते. मात्र, या तलावाच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मानवी अतिक्रमण वाढत आहे. तलाव क्षेत्रातील नैसर्गिक वृक्षसंपदा कमी होत आहे. यामुळे जवळपास डझनभर जातींचे पक्षी यावर्षी इकडे फिरकलेच नाहीत, असे या अभ्यासातून पुढे आले आहे. तसेच कायमस्वरूपी वास्तव्यास असणारे पक्षीही कमी होत आहेत. तलावाच्या बाह्य क्षेत्रात ही अवस्था असेल, तर तलाव क्षेत्रातही जैवविविधतेवर परिणाम होत असण्याची शक्यता आहे. कागल नगरपालिकेने या तलावाच्या सुशोभीकरणासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. तसेच पाण्याची पातळी टिकून राहावी म्हणूनही विविध उपाययोजना केल्या आहेत. तरीसुद्धा तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी दरवर्षी अडथळे येत आहेत. वनमित्र संस्थेने केलेल्या निरीक्षणावेळी येथील श्री शाहू हायस्कूल, यशवंतराव घाटगे हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक तसेच संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे, अशोक शिरोळे, प्रवीण जाधव, कार्तिक परीट, कैलास पाटील, काशीनाथ गारगोटे, महादेव कवठे, विक्रम चव्हाण, लखन मुरगुडे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले. तलाव क्षेत्रातील कायम रहिवासी पक्षीपांढरा टिळा असणारा वारकरी पक्षी, पाणकावळा, ढोकरी बगळा, खंड्या, टिटवी, गोरली, चंडोल, अबलक धोबी, मोठा बगळा, गाय बगळा, नदी कुररी, बंड्या, टिबक्याची मनोली, पाकोळी, उंदीर घार, वेडा राघू हे कायम वास्तव्य करणारे पक्षी या निरीक्षणादरम्यान दिसले. मात्र, त्यांची संख्या कमी होत आहे. जमिनीवरील आणि झाडांवरील घरट्यांचीही पाहणी करण्यात आली. परदेशी पाहुणेश्रीलंकन बेटावरून स्थलांतर करून येणाऱ्या घनसर या पक्ष्याची जोडी निरीक्षणात आढळली. ब्राह्मणी घारींची जोडीही दिसली. मात्र पाणलावा, शेकाट्या, कंकर, अंधार ढोकरी, चाटू, जांभळी, पाणकोंबडी, चाम ढोक, घोगल्या कोंडा, कामऱ्या ढोक हे स्थलांतरित पक्षी आढळले नाहीत. दरवर्षी ही संख्या घटत आहे. नैसर्गिक अन्नसाखळीतील विविध घटक नष्ट होत असल्याने पक्षीही अन्य ठिकाणी जाणे पसंत करतात. कागलच्या जयसिंगराव तलावाच्या विकासवाडी, वनीकरणाकडील बाजूस विविध जैवविविधता विपुल प्रमाणात आढळते. मात्र, ती दिवसेंदिवस कमी होत आहे. शासन आणि लोकसहभागातून याबद्दल जनजागृती करून उपाययोजना करण्याची गरज आहे. - राजेंद्र घोरपडे, अध्यक्ष, वनमित्र संघटना, कागल