शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
2
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
5
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
6
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
8
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
9
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
10
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
11
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
12
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
13
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
14
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
15
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
16
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
17
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
18
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
19
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
20
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

जयसिंगराव तलाव क्षेत्रात पक्ष्यांची संख्या घटली

By admin | Updated: October 21, 2015 00:10 IST

वनमित्र संस्थेची पाहणी : पाणीपातळी घटल्याचा परिणाम, जैव विविधतेवरही परिणाम

कागल : कागलच्या ऐतिहासिक जयसिंगराव तलावातील पाणी पातळी कमी होण्याचे प्रमाण गेले तीन-चार वर्षे कायम आहे. पाणी पातळी कमी होण्याची विविध कारणे असून, त्याचे परिणामही जाणवत आहेत. पाणी पातळी कमी झाल्याने तलाव क्षेत्रातील जैवविविधतेवरही परिणाम होत असून, या तलाव क्षेत्रात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येतही घट होत आहे. येथील वनमित्र संस्थेने वन्यजीव सप्ताहादरम्यान केलेल्या निरीक्षणामध्ये ही बाब समोर आली आहे. गडकोट स्वच्छता मोहीम, निसर्ग संवर्धन, वन्यजीव संरक्षण अशा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वनमित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गेली सात वर्षे या जयसिंगराव तलावाच्या क्षेत्रातील जैवविविधतेचा अभ्यास सुरू ठेवला आहे. त्यांनी साधारणत: तलावाच्या पाण्यात राहणारे आणि तलावाच्या भोवती असणाऱ्या जंगल-वृक्ष क्षेत्रात राहणारे पक्षी आणि दरवर्षी स्थलांतर करून येणारे परदेशी पाहुणे पक्षी यांची यादी तयार केली आहे. जून ते डिसेंबर या कालावधीत स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य या ठिकाणी असते. मात्र, या तलावाच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मानवी अतिक्रमण वाढत आहे. तलाव क्षेत्रातील नैसर्गिक वृक्षसंपदा कमी होत आहे. यामुळे जवळपास डझनभर जातींचे पक्षी यावर्षी इकडे फिरकलेच नाहीत, असे या अभ्यासातून पुढे आले आहे. तसेच कायमस्वरूपी वास्तव्यास असणारे पक्षीही कमी होत आहेत. तलावाच्या बाह्य क्षेत्रात ही अवस्था असेल, तर तलाव क्षेत्रातही जैवविविधतेवर परिणाम होत असण्याची शक्यता आहे. कागल नगरपालिकेने या तलावाच्या सुशोभीकरणासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. तसेच पाण्याची पातळी टिकून राहावी म्हणूनही विविध उपाययोजना केल्या आहेत. तरीसुद्धा तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी दरवर्षी अडथळे येत आहेत. वनमित्र संस्थेने केलेल्या निरीक्षणावेळी येथील श्री शाहू हायस्कूल, यशवंतराव घाटगे हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक तसेच संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे, अशोक शिरोळे, प्रवीण जाधव, कार्तिक परीट, कैलास पाटील, काशीनाथ गारगोटे, महादेव कवठे, विक्रम चव्हाण, लखन मुरगुडे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले. तलाव क्षेत्रातील कायम रहिवासी पक्षीपांढरा टिळा असणारा वारकरी पक्षी, पाणकावळा, ढोकरी बगळा, खंड्या, टिटवी, गोरली, चंडोल, अबलक धोबी, मोठा बगळा, गाय बगळा, नदी कुररी, बंड्या, टिबक्याची मनोली, पाकोळी, उंदीर घार, वेडा राघू हे कायम वास्तव्य करणारे पक्षी या निरीक्षणादरम्यान दिसले. मात्र, त्यांची संख्या कमी होत आहे. जमिनीवरील आणि झाडांवरील घरट्यांचीही पाहणी करण्यात आली. परदेशी पाहुणेश्रीलंकन बेटावरून स्थलांतर करून येणाऱ्या घनसर या पक्ष्याची जोडी निरीक्षणात आढळली. ब्राह्मणी घारींची जोडीही दिसली. मात्र पाणलावा, शेकाट्या, कंकर, अंधार ढोकरी, चाटू, जांभळी, पाणकोंबडी, चाम ढोक, घोगल्या कोंडा, कामऱ्या ढोक हे स्थलांतरित पक्षी आढळले नाहीत. दरवर्षी ही संख्या घटत आहे. नैसर्गिक अन्नसाखळीतील विविध घटक नष्ट होत असल्याने पक्षीही अन्य ठिकाणी जाणे पसंत करतात. कागलच्या जयसिंगराव तलावाच्या विकासवाडी, वनीकरणाकडील बाजूस विविध जैवविविधता विपुल प्रमाणात आढळते. मात्र, ती दिवसेंदिवस कमी होत आहे. शासन आणि लोकसहभागातून याबद्दल जनजागृती करून उपाययोजना करण्याची गरज आहे. - राजेंद्र घोरपडे, अध्यक्ष, वनमित्र संघटना, कागल