शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

३२ सायझर्सना नोटिसा

By admin | Updated: May 29, 2015 00:18 IST

इचलकरंजीत ‘प्रदूषण’ची कारवाई : वीज, पाणी तोडण्याचा आदेश

भीमगोंडा देसाई -कोल्हापूर -जिल्ह्यात ‘वस्त्रनगरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीतील ३२ सायझर्सचे (प्रोसेस) वीज, पाणी तोडून त्यांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रशासनाने दिले आहेत. सोमवारपर्यंत (१ जून) नोटीस दिलेल्या सायझर्सना म्हणणे मांंडण्याची संधी दिली आहे. त्यानंतर प्रत्यक्षात कारवाई होणार आहे. सर्व्हेमध्ये जलस्रोत दूषित केल्याचे स्पष्ट झाल्याने ही कारवाई केली जाणार आहे. पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न न्यायालयात गेल्याने राजकीय दबाव जुगारत प्रदूषणाचे प्रशासन कारवाईचा बडगा उगारत आहे. त्यामुळे वस्त्रनगरीत खळबळ माजली आहे. पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी उच्च न्यायालयात जनहित याचिका ाखल झाली आहे. यांतील एक याचिकाकर्ते इचलकरंजीचे आहेत. पंचगंगा प्रदूषण होण्यास लहान-मोठ्या उद्योगांतून बाहेर पडणारे औद्योगिक सांडपाणी कारणीभूत आहेत. त्यामुळे कारवाईसाठी ‘प्रदूषण’चे प्रशासन सक्रिय झाले आहे. गेल्या महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीने कारवाईसंबंधी पाठपुरावा केला होता.कापडावर प्रक्रिया करून रंगकाम, नक्षीकाम, ब्लीचिंग करणारे अनेक उद्योग व सायझर्स इचलकरंजीत आहेत. कापडावर प्रक्रिया करण्यासाठी वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. दरम्यान, ‘प्रदूषण’च्या प्रशासनाने इचलकरंजीत नोंदणीकृत असलेल्या १६९ पैकी ४० सायझर्सचा सर्व्हे गेल्या महिन्यात केला. त्यामधील तब्बल ३२ सायझर्सनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र घेतलेले नाही. एका सायझरकडून कमीत कमी ५०० ते १ हजार लिटर प्रदूषित पाणी गटारात सोडले जाते. वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया केली जात नाही. सामुदायिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात रीतसर सभासद नाहीत, असे गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत.त्यामुळे संबंधित ३२ सायझर्सची वीज, पाणी कनेक्शन बंद करावे, असा आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. वीज वितरण कंपनीला वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले आहेत. पूर्णपणे उत्पादन बंद करण्याचीही कारवाई केली जाणार आहे. कारवाईसंबंधीची नोटीस पोहोचल्यानंतर सायझर्स एकत्रित येऊन कारवाई टाळण्यासाठी धावाधाव करीत आहेत. नव्याने रुजू झालेले ‘प्रदूषण’चे प्रादेशिक अधिकारी नरसिंग शिवांगी यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी नूतन अधिकारी शिवांगी यांचे स्वागत करण्याच्या निमित्ताने नोटीस दिलेल्या सायझर्सच्या मालकांनी सोमवारपर्यंत कारवाई करू नका, अशी विनंती केली आहे. प्रदूषणच्या प्रशासनाने सोमवारपर्यंत त्यांना बाजू मांडण्याची संधी दिली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रशासनाने केलेल्या सर्व्हेमध्ये इचलकरंजीतील ३२ सायझर्स प्रदूषणास जबाबदार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वीज, पाणी कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले आहेत. उत्पादन बंदचीही कारवाई होणार आहे. - मनीष होळकर, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळपंचगंगा प्रदूषणास जबाबदार असलेल्या सर्व घटकांवर कारवाई झाली पाहिजे, यासाठी पाठपुरावा करीत राहणार आहे. इचलकरंजीमध्ये अनेक सायझर्सची कोठेही नोंद नाही. त्यांचे प्रदूषित पाणी पंचगंगेत मिसळत आहे. त्यामुळे सर्वच उद्योगांचा सर्व्हे करून प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करावी. - बंडू पाटील, अध्यक्ष, स्वाभिमानी युवा शेतकरी संघटना कोणाला नोटीस?इचलकरंजी शहर व परिसरातील नोटीस दिलेल्या सायझर्सची नावे: न्यू नॅशनल, अरुण सायझिंग, समृद्धी इंडस्ट्रीज, शंकर-पार्वती (कोरोची), लक्ष्मीप्रसाद, संगम, गोविंद, जठार टेक्सटाईल प्रा. लि., युनिट एक व दोन, सर्वेश्वर, ज्ञानेश्वर माउली, उज्ज्वला सायझिंग युनिट, महावीर, ओम, राधामाधव, कन्हैया, ओमकार, कल्लेश्वर, लाड ग्रुप आॅफ इंडस्ट्रीज, रसाई, माउली, गुलाब आनंद, मयूर ब्लीचर्स, चौंडेश्वरी, गुरुकृपा, मोहन, बालनाथ, विमल, वंदना, हिरा को-आॅपरेटिव्ह टेक्सटाईल, राजविलास, भैरवनाथ, रामकृष्ण टेक्सफॅब प्रा. लिमिटेड (कोरोची).