शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

भगवान महावीरांच्या तत्त्वांची गरज

By admin | Updated: December 22, 2014 00:15 IST

उज्ज्वल निकम : दक्षिण भारत जैन सभेच्या पुरस्कारांचे उत्साहात वितरण

कोल्हापूर : इस्लामाबाद येथील भेटीत पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना मी निक्षून सांगितले होते की, दहशतवादाला आवरा, स्वत:ला सावरा; पण त्यांनी दुर्लक्ष केले आणि हेच दुर्लक्ष पेशावरमधील घटनेने त्यांच्यावर उलटले. प्रबळ लोकशाही असलेल्या आपल्या देशाला अहिंसेची परंपरा आहे. दहशतवादाची सध्याची परिस्थिती पाहता भगवान महावीर यांच्या अहिंसावादी तत्त्वांची जगाला गरज आहे, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज, रविवारी येथे केले. दक्षिण भारत जैन सभेच्या ९४ व्या अधिवेशनात विविध पुरस्कार वितरण व स्मरणिका प्रकाशन समारंभात ते बोलत होते. येथील मार्केट यार्डमधील शाहू सांस्कृतिक मंदिरातील या कार्यक्रमास श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे हे प्रमुख उपस्थित, तर अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील होते.उज्ज्वल निकम म्हणाले, अहिंसाप्रिय असल्याने आपण मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातून सावरलो. भगवान महावीर यांच्या अहिंसावादी तत्त्वांचे पालन करणे गरजेचे आहे. समाजाच्या विकासासाठी जैन बांधवांनी कार्यरत राहावे.श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची जैन समाजातील परंपरा उल्लेखनीय आहे. अ‍ॅड. गोविंद पानसरे म्हणाले, कम्युनिस्ट असलो, तरी धर्मतत्त्वांचे पालन करणाऱ्यांना मानतो.कार्यक्रमात ‘करवीररत्न’ स्मरणिकेचे प्रकाशन झाले. त्यानंतर पंडित सुशीलकुमार उपाध्ये, माजी आमदार प्रा. शरद पाटील, अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे यांचा विशेष सन्मान केला. सागर चौगुले, सुरेश रोटे, सुभाष चौगुले, डॉ. जे. एफ. पाटील, डी. सी. पाटील, नगरसेवक राजू लाटकर, अपर्णा आडके, किरण शिराळे, आदी उपस्थित होते. डी. ए. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुकुमार बेळंके व पार्श्वनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संजय शेटे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)यांचा झाला सन्मान...ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे, डॉ. सुनीलकुमार लवटे, प्रा. साधना झाडबुके, राजेंद्र पाटील-यड्रावकर, डॉ. जयकुमार उपाध्ये (नवी दिल्ली), मीना गरिबे (नाशिक), प्रा. धरणेंद्र कुरकुरी (कर्नाटक), डॉ. कुबेर मगदूम (इचलकरंजी), अजितकुमार भंडे (मालगाव), श्रीधर मेक्कळके (निपाणी), सुधा नेजे (भोज, कर्नाटक), वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्था यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले. मानपत्र, शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.निकम म्हणाले...४ समाजातील युवक-युवतींनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे.४ समाजाच्या तत्त्वांचे पालन होते का, याबाबत अंतर्मुख व्हावे.४पैसा, श्रीमंती यांचे ओंगळवाणे प्रदर्शन टाळून गरजूंना मदत करावी.४जैन समाजातील स्त्रियांना शिक्षणाकडे आकृष्ट करावे.४प्रत्येक ठिकाणी विशिष्ट संरक्षण, आरक्षणाचा न्यूनगंड बाजूला सारावा.