शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षांत मोदींचा काळा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

कॉंग्रेस कमिटीमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, सन २०१४ मध्ये मोदींनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत ...

कॉंग्रेस कमिटीमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले की, सन २०१४ मध्ये मोदींनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत केंद्रात भाजपचे सरकार स्थापन केले. त्यांच्या कार्यकालास सात वर्षे पूर्ण झाली, तरी कोणताही घटक समाधानी नाही. देशाची अधोगती झाली. नोटबंदी, जीएसटी, अचानक लॉकडाऊन अशा घातकी निर्णयांमुळे देशाचे नुकसान झाले. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर अचानक रात्री १२ वाजता लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यामुळे कामगारांचे, स्थलांतरितांचे हाल झाले. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. अनेक उद्योग, धंदे अडचणीत आले. अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या. बेरोजगारी वाढली. हे कमी म्हणून की काय त्यांनी कामगारविरोधी कायदे केले. शेतकरीविरोधी काळे कायदे आणले.

मोदींना कोरोना नियंत्रणात आणता आलेला नाही. देशात व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची टंचाई आहे. सुरुवातीला ४५ वर्षांवरील लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात होती. एके दिवशी मोदींनी ‘मन की बात’मध्ये १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा केली. ही घोषणा करताना लसीच्या उपलब्धतेचा विचार केला नाही. परिणामी, लसीकरणाची मोहीम विस्कळीत झाली. कोरोनामुळे फटका बसलेल्यांना २० लाख कोटींची घोषणा केली. पण हे पैसे नेमके कोठे गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पत्रकार परिषदेस आमदार पी. एन. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील आदी उपस्थित होते.

चौकट

पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर बंद

पालकमंत्री पाटील म्हणाले की, विविध सामाजिक संस्था, सीएसआरमधून पाच हजार कोटींपर्यंत पीएम केअर फंड संकलित केला. यातून रुग्णालयांना दिलेले व्हेंटिलेटर बंद आहेत. अभिव्यक्ती स्वतंत्र्याची गळचेपी केली जात आहे. जगात सर्वाधिक वेळा भारतातच इंटरनेट बंद करण्याचा पराक्रमही मोदी यांनी केला आहे. मोदींच्या अशा चुकीच्या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा मलिन होत आहे.

केंद्रामुळेच इंधन दरवाढ

पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली. डिझेलचा दरही वाढला आहे. याला केंद्र सरकार जबाबदार आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई गगनाला भिडली आहे. सामान्य, गरिबांचे जगणे अडचणीचे झाले आहे असे पाटील यांनी सांगितले. सात वर्षांत मोदींनी भाषणबाजी करणे, इव्हेंट करीत इमेज मॅनेजमेंट करण्याचाचा प्रयत्न केल्याचाही आरोप त्यांनी केला.