शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री अशोक चव्हाण म्हणजे मुख्यमंत्रिपदावरून कोतवाल बनलेले राजकारणी : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाममंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण हे मुख्यमंत्रिपदावरून कोतवाल बनलेले राजकारणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाममंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण हे मुख्यमंत्रिपदावरून कोतवाल बनलेले राजकारणी आहेत, अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी शनिवारी कोल्हापुरात केली. चव्हाण यांना कसलेही स्वातंत्र्य नाही, ते आता पोपटासारखे बोलत आहेत; पण त्यांचा पिंजऱ्यातील पोपट झाला आहे, अशीही टिपणी त्यांनी केली.

आरक्षण मर्यादेवरून मंत्री चव्हाण यांनी शुक्रवारी हात-पाय बांधून तलवार हाती दिली तर लढणार कसे, असे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना सदाभाऊ खोत यांनी चव्हाण यांच्यावर टीकेचे बाण सोडताना त्यांना मराठा आरक्षण उपसमितीवरून हटवावे अशीही मागणी केली. चव्हाण यांच्या रूपाने मुख्यमंत्रिपद भूषविलेला पुन्हा कमी दर्जाचे खाते सांभाळताना दिसत आहे. हे म्हणजे तलाठ्याचा कोतवाल झाल्यासारखे आहे. त्यांची वक्तव्ये पाहता त्यांच्यावर आता वेड्याच्या रुग्णालयात जायची वेळ आली आहे. तुम्ही फार हुशार आहात, तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे, दोन वर्षे काय करीत होता, अशी टिपणीही खोत यांनी केली.

खोत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण करंट्या महाविकास सरकारमुळे रद्द झाले. राज्य सरकारने कोर्टात योग्यरीत्या बाजू मांडली नाही. विरोधी पक्षांनाही सोबत घेतले नाही. वकिलांना मार्गदर्शन केले नाही. गायकवाड समितीतील महत्त्वाचे पुरावे जोडले नाहीत. केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले; पण राज्य सरकार का गेले नाही. यावरून सरकारमधील मराठा समाजाच्या नेत्यांना आरक्षण द्यायचे नाही हे स्पष्ट होते.

----------------------------------------

तेव्हा तुमचे हात-पाय बांधले होते का

खोत म्हणाले, तुम्ही केंद्रात आणि राज्यात सत्तेवर होतात, तेव्हा तुमचे कोणी हात-पाय बांधले होते का. ज्यांना आरक्षण नको त्या मराठा नेत्यांनी खुराड्यात बसून अंडी घालावीत. हे सरकार मराठ्यांचे शत्रू आहे. सारथी संस्था या सरकारने बंद पाडली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळही राज्य नियोजन मंडळात विलीन केले. नाव मराठ्यांचे घेऊन सरदारकी भोगणारे हे सगळे चोराच्या आळंदीला जायला निघाले आहेत.