शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मीटर नसणारे नळ कनेक्शन होणार बंद

By admin | Updated: March 9, 2017 23:52 IST

जयसिंगपूर पालिकेची मोहीम : नळधारकांची मानसिकता बदलण्याची गरज; जेवढा पाण्याचा वापर तेवढा पाणी कर

संदीप बावचे --जयसिंगपूर शहरात ७९०० ग्राहकांपैकी यातील ९२ टक्के नळधारकांनी आतापर्यंत नळांना मीटर बसविली आहेत. साडेचार वर्षांपूर्वी जयसिंगपूर पालिकेने शहरात नळांना मीटर बसविण्याची मोहीम सुरू केली होती. जेवढा पाण्याचा वापर तेवढा पाणी कर, अशा या योजनेत शहरवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, अजूनही आठ टक्के नळधारकांनी नळाला मीटर न बसविल्यामुळे येत्या एप्रिलपासून असे नळ कनेक्शन बंद करण्याची मोहीम पालिका राबविणार आहे. पाण्याचा अपव्यव टाळण्यासाठी आणि आवश्यक तेवढाच पाण्याचा वापर करण्याची सवय नागरिकांना लागावी. शिवाय शहराला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने नगरपालिकेमार्फत शहरातील पाणीपुरवठा मीटर पद्धतीने करण्याची अंमलबजावणी १ जूलै २०१२ पासून सुरू झाली होती. सन २०१२-१३ मध्ये ६० टक्के ग्राहकांनी नळाला मीटर बसविले. त्यानंतर टप्प्याटप्प्यांने ही मोहीम राबविण्यात आली. शहराचा वाढता विस्तार व पाण्याची मुबलकता वाढू लागल्याने नवीन पाण्याची टाकी उभारण्यात आली़ शहरवासीयांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात पुरेशा समान दाबाने देण्याकरिता शहरात नळांना मीटर बसविण्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. नळांना मीटर बसविण्याबाबत शहरवासियांत जनजागृती मोहीम राबवून ज्या ठिकाणी अडचणी आहेत, तेथेही टप्प्याटप्प्यांने मीटर बसविण्यात आले. शहरात ७९०० नळ कनेक्शनधारक असून, यापैकी ९२ टक्के ग्राहकांनी नळाला मीटर बसविलेली आहेत. मात्र, उर्वरित नळ कनेक्शनधारकांनी नळाला मीटर बसविले नाहीत. तसेच जे नळधारक नळांना मोटर लावतात, अशा नळधारकांचे येत्या एप्रिलपासून नळ कनेक्शन बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असल्याची माहिती पाणीपुरवठा प्रशासनाने दिली. त्यामुळे ज्यांनी मीटर बसविलेले नाहीत त्यांनी मिटर बसवून सहकार्य करावे, असे आवाहनही पालिकेने केले आहे़ मोहीम तीव्र करणारपाणी करासाठी ‘कनेक्शन बंद’ची मोहीम पालिका राबवित आहे. प्रशासनाकडून पाणीपट्टी, थकबाकी वसुली अंतर्गत वर्षानुवर्षे जे नळ कनेक्शनधारक पाणीकर भरत नाहीत, अशा सुमारे तीनशेहून अधिक नळधारकांची नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई पालिकेने केली आहे. कर न भरणाऱ्यांना नोटिसा बजावून ही मोहीम राबविण्यात आली असून, १५ मार्चनंतर ही मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे. पाण्याचा अपव्यव टाळण्यासाठी आणि आवश्यक तेवढाच पाण्याचा वापर करण्याची सवय नागरिकांना लागावी यासाठी प्रयत्न.शहरात आतापर्यंत ९२ टक्के नळधारकांनी नळाला मीटर बसविले आहेत. जेवढा पाण्याचा वापर तेवढा पाणी कर याबाबत टप्पे ठेवण्यात आले आहेत.शहराचा पाणीपुरवठा हायटेक करण्याच्या दृष्टिकोनातून नळ पाणीपुरवठा जॅकवेलचे विस्तारीकरण, जलशुद्धीकरणाचे नूतनीकरण याचबरोबर नवीन पाण्याची टाकी, असे पालिकेचे धोरण आहे.