शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

भारत-चीनचे ताणलेल्या सबंधाकडे संधी म्हणून पहा :चेतन नरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 17:06 IST

भारत-चीनचे ताणलेले सबंध व कोरोना या पार्श्वभूमीवर स्थानिक उद्योजकांनी याकडे संधी म्हणून पाहून तोच ट्रेंड पकडून काम केले तर यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही. असा विश्वास थायलंडचे उपपंतप्रधानाचे वाणिज्य सल्लागार चेतन अरूण नरके यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्देथायलंडचे वाणिज्य सल्लागार चेतन नरके यांचे स्थानिक उद्योजकांना आवाहन जागतिक पातळीवर सगळ्यांशी संबध बिघडवणे चीनला अडचणीचे

कोल्हापूर : चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय केवळ भावनिक करून चालणार नाही. त्याचा फटका दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो, जागतिक पातळीवर सर्वच देशांशी बिघडलेले सबंध चीनला भविष्यात अडचणीचे ठरू शकतात. भारत-चीनचे ताणलेले सबंध व कोरोना या पार्श्वभूमीवर स्थानिक उद्योजकांनी याकडे संधी म्हणून पाहून तोच ट्रेंड पकडून काम केले तर यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही. असा विश्वास थायलंडचे उपपंतप्रधानाचे वाणिज्य सल्लागार चेतन अरूण नरके यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

चेतन नरके यांनी मंगळवारी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट देत भारत-चीन मधील ताणलेले सबंध आणि कोरोनामुळे घसरलेला जेडीपी यावर सविस्तर चर्चा केली.

नरके म्हणाले, चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकणे हा भावनिक मुद्दा असला तरी अर्थकारणाचा विचार केला पाहिजे. आपली औषध, खते, आयर्न, स्टील निर्मिती चीनवर अवलंबून आहे. भारतात ज्या प्रमाणे शेतीला अनुदान दिले जाते, त्याप्रमाणे तिथे इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह इतर उत्पादनांवर अनुदान दिले जात असल्याने त्यांना कमी दरात विक्री करणे परवडते. आपण चीन ५ टक्के निर्यात करतो मात्र १४ टक्के चीनमधून आयात करत आहे. यावरून आपले मार्केट चीनी उत्पादनांनी किती काबीज केले हे स्पष्ट होते.

चीनशी बिघडलेले संबधांचा कमी अधिक प्रमाणात सर्वच देशांना फायदा, तोटा होणार आहे. थायलंडची अर्थव्यवस्था सक्षम होण्यात तेथील पर्यटन व्यवसायाचा खूप हातभार आहे. भारतातून दर वर्षी २० लाख पर्यटक थायलंडला जातात. थायलंड मध्ये काही रेडलाईट भाग आहे, ते म्हणजे थायलंड नव्हे तर त्यापेक्षाही येथील शेती, मासेमारी, पर्यटन ही त्यांची बळस्थाने आहेत. थायलंडकडून ही गोष्ट भारताला पर्यायाने महाराष्ट्राला घेण्यासारखी आहे.

महाराष्ट्रात गडकोट किल्ले आहेत, यासह एकूणच पर्यटन स्थले विकसीत केली तर परदेशी पर्यटकांचा ओढा सुरू होईल, आणि यातून किमान ९ लाख रोजगार उपलब्ध होऊ शकतील. याबाबत आपण राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून ते सकारत्मक आहेत. नागरी सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून अंकुश आणला, हे चांगले आहे. सहकार आणि रिझर्व्ह बँकेंने एकत्रित येऊन काम केले तर सहकार चळवळ बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास चेतन नरके यांनी व्यक्त केला. यावेळी लोकमतचे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, मुख्य बातमीदार विश्वास पाटील आदी उपस्थित आहे.
 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर