शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे निराधार मुलांची सुरू आहे उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येथील बालकल्याण संकुल व जिल्ह्यातील अन्य संस्थातून अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर बाहेर पडलेल्या सुमारे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : येथील बालकल्याण संकुल व जिल्ह्यातील अन्य संस्थातून अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर बाहेर पडलेल्या सुमारे १८० मुलांची उपासमार होत आहे. त्यांना अजून नोकरी नाही. कांहीजण किरकोळ हातावरील कामे करून शिक्षण घेत आहेत परंतु लॉकडाऊनमुळे सगळेच ठप्प झाल्याने त्यांच्या रोजच्या जेवणाचे वांदे झाले आहे. किमान एक महिन्यांसाठी त्यांना अन्नधान्याचे किट देण्याची गरज आहे. त्यासाठी बालकल्याण संकुलचे विश्वस्त व्ही. बी. पाटील व मानद कार्यवाह पद्मा तिवले यांनी मदतीचे आवाहन केले आहे.

ही सर्व मुले अनाथ, निराधार, निराश्रित आहेत. जगण्याच्या एका टप्प्यावर ती बालकल्याण संकुलसह विविध संस्थामध्ये आली. तिथे राहून त्यांचे उत्तम संगोपन व शिक्षणही झाले. परंतु राज्य शासनाच्या नियमानुसार ही मुले सज्ञान झाली की त्यांना संस्थेत राहता येत नाही. अशा घरट्यातून बाहेर पडलेल्या मुलांसाठीच आधाराची गरज आहे. ही मुले शिक्षण घेत अर्धवेळ नोकरी करत आहेत. कांहीजण अंगावरील कामे करून उपजीविका करत आहेत. मुली दवाखान्यात आया म्हणून काम करतात. कांहीजणी धुण्याभांड्याची कामे करतात. जळगांवचे दीपस्तंभ फाऊंडेशन, पुण्यातील सनाथ वेल्फअर फाऊंडेशन व ठाणे येथील अविशत ट्रस्ट यांनी आतापर्यंत महिनाभर पुरेल इतकी मदत दिली. परंतु अजूनही एका महिन्याचे अन्नधान्याचे किट देण्याची गरज आहे. त्यामध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ, खाद्यतेल, डाळ, कडधान्ये, साखर, चहापूड, चटणी, कांदे-बटाटे व साबण हे साहित्य असेल. महिलांसाठी सॅनिटेशनचे दोन पॅड दिले जातील. समाजातील ज्या दानशूर व्यक्तींना मदत करायची आहे, त्यांनी बालकल्याण संकुल (०२३१-२६२५४२९) किंवा पद्मा तिवले (मो-९८२३१९२९६३) यांच्याशी संपर्क साधावा. जमा झालेली मदत प्रत्यक्ष लाभार्थींच्या हातात दिली जाणार आहे.