बालकाच उन्नतीचा मार्ग म्हणजे साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:52 IST2021-02-05T06:52:24+5:302021-02-05T06:52:24+5:30
उत्तूर : साहित्य संमेलनातून विविधांगी माहिती मिळते. साहित्य, कला, वाड्:मय यांची जोपासना ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन बालनाट्य ...

बालकाच उन्नतीचा मार्ग म्हणजे साहित्य संमेलन
उत्तूर : साहित्य संमेलनातून विविधांगी माहिती मिळते. साहित्य, कला, वाड्:मय यांची जोपासना ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन बालनाट्य लेखक ज्योतिराम कदम (पुणे) यांनी केले. उत्तूर (ता. आजरा) येथे आयोजित चौथ्या त्रिवेणी ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. स्वागताध्यक्षपदी डॉ. प्रकाश तौकरी होते.
त्रिवेणी सांस्कृतिक संस्था, नवजीवन विद्यालय व वसंतरावदादा पाटील विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य संमेलन पार पडले. प्रतिमापूजन व स्वागत गीतानंतर साहित्य संमेलनांची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. संमेलनाध्यक्ष कदम यांनी आठ भाकरीची कथा सांगून कष्टाचे महत्त्व सांगितले. साहित्याची गोडी लहानपणी निर्माण झाल्यास संस्कारक्षम वाड्:मय् मुलांच्या हातात पडेल.
यावेळी संमेलनाध्यक्ष, कदम, स्वागताध्यक्ष तौकरी, सरपंच वैशाली आपटे, उपसरपंच सचिन उत्तूरकर, विश्वास देसाई, मारुतीराव झेंडे-पाटील, हर्षदा खोराटे, भिकाजी ढोणुक्षे, महेश करंबळी, टी. के. पाटील, अनिल लोखंडे, अजित उत्तूरकर, प्रकाश भोईटे, सुरेश वड्राळे, अशोक दुधाळे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
श्रीकांत नाईक यांनी प्रास्तविक केले. सुरेश कांबळे यांनी स्वागत केले. अस्मिता गुरव व सुरेखा परीट यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र येसादे यांनी आभार मानले.
--------------------------
* साहित्यिकांनी रंजकता आणली
साहित्यिक बाबूराव सिरसाठ, नीलम माणगावे, माया कुलकर्णी, स्नेहा वाबळे, वर्षा चौगुले, पुष्पा कुलकर्णी आदींनी दुसऱ्या सत्रात कथा, गोष्टी, कविता, समूहगीते सांगून साहित्य संमेलनात रंजकता आणली.
-----------------
* लेखकांचा गौरव त्रिवेणीच्या साहित्य पुरस्काराने लेखक नंदू साळोखे (बेलेवाडी), जयप्रभू कांबळे (आर्दाळ), अक्षर दालनचे रवींद्र जोशी, माया कुलकर्णी, संपत चव्हाण यांना संमेलनाध्यक्ष ज्योतिराम कदम यांच्या हस्ते गौरविण्यात आले. -------------------------
फोटो ओळी : उत्तूर (ता. आजरा) येथे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे ज्योतिराम कदम यांनी दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. यावेळी विश्वनाथ करंबळी, उमेश आपटे, वैशाली आपटे, विश्वास देसाई, आदी उपस्थित होते.
क्रमांक : ३१०१२०२१-गड-०६