शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

Coronavirus in Maharashtra कोरोनासह जगण्याची सवय करूया...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 20:11 IST

आता या कोरोनामुळे निर्माण झालेले प्रचंड मोठे आर्थिक संकटही ‘जीवघेणे’ आहे. आपली पूर्ण अर्थव्यवस्था ही खुल्या आर्थिक धोरणांच्या निकषावर आधारलेली असल्याने ती लगेच ‘स्वयंपूर्ण खेडी’च्या पद्धतीवर परिवर्तीत होऊ शकत नाही. हे स्थित्यंतर केवळ वेदनादायी नाही तर जीवघेणे आहे. करोडो लोक बेरोजगार आणि लाखो लोकांची उपासमार होण्याचा धोका आहे.

ठळक मुद्देआपल्या देशात दरवर्षी विविध कारणांनी जाणाऱ्या बळींची आकडेवारी

वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू होण्याचे प्रमाण पाहिले तर प्रश्न असा निर्माण होतो की, कोविडला घाबरायचे तरी कशाला..? कारण हा नवा विषाणू होता. आजही लस उपलब्ध नाही, निश्चित औषध उपलब्ध नाही. याचा संसर्ग पसरण्याची क्षमता खूप जास्त आहे. लॉकडाऊन केला नसता तर एक व्यक्ती महिन्याभरात ४०६ लोकांना संसर्ग देऊ शकतो. लॉकडाऊन ५० टक्के केला तर १५ आणि ७५ टक्के केला तर केवळ २.६ टक्के व्यक्ती बाधित होतात. आपली लोकसंख्या घनता, दारिद्र्य व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा अभाव यामुळे लॉकडाऊनचा कटू पर्याय शासनाला निवडावा लागला. जी चूक अनेक प्रगत देशांनी केली ती आपण केली नाही.

आता हा कोरोना कोठेही निघून गेलेला नाही, तो इथेच आहे. दीड महिन्यापूर्वी आपल्याला त्याच्याबद्दल माहिती कमी होती, लढाईसाठी साधने अपुरी होती, पण आता बरेच प्रबोधन झाले आहे. सर्वांना धोक्याची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे. हे खूप कठीण आहे, पण त्याला दुसरा पर्याय दिसत नाही. जोपर्यंत शास्त्रज्ञ यावर लस अथवा औषध शोधत नाहीत तोपर्यंत आपल्याला कोरोनासह जगायचे आहे. त्यासाठी मास्क, हातांची स्वच्छता, परस्परांतील अंतर हे आपल्या सवयीचा भाग बनले पाहिजे. हे काही दडुंक्याच्या जोरावर बळजबरीने शिकवण्याची गोष्ट नाही, असे मला वाटते.आता या कोरोनामुळे निर्माण झालेले प्रचंड मोठे आर्थिक संकटही ‘जीवघेणे’ आहे. आपली पूर्ण अर्थव्यवस्था ही खुल्या आर्थिक धोरणांच्या निकषावर आधारलेली असल्याने ती लगेच ‘स्वयंपूर्ण खेडी’च्या पद्धतीवर परिवर्तीत होऊ शकत नाही. हे स्थित्यंतर केवळ वेदनादायी नाही तर जीवघेणे आहे. करोडो लोक बेरोजगार आणि लाखो लोकांची उपासमार होण्याचा धोका आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या मालाची वाहतूक चालू केली आहे. त्यामुळे जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा जाणवत नसून कृषी अर्थव्यवस्था बऱ्याच प्रमाणात रुळावर येण्यास प्रारंभ झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरील १९ तपासणी नाक्यांवरील आकडेवारीप्रमाणे एका दिवशी ५ मे रोजी ६९०० मालवाहतुकीच्या वाहनांनी प्रवेश केला. यापैकी ४०७८ वाहने कोल्हापूर जिल्ह्यात थांबणारी होती. याचा अर्थ सुमारे आठ हजार चालक आणि क्लीनर यांचा प्रवेश जिल्ह्यात झाला. तसेच ३४२ वाहने वेगवेगळ्या राज्य आणि महाराष्ट्रातील जिल्ह्यांतून परवाना घेऊन कोल्हापुरात आली. कोणी मृत, कोणी प्रसूतीसाठी, कोणी लहान मुलांना सोडण्यासाठी, घेऊन जाण्यासाठी, उपचारासाठी, शासकीय कर्तव्यावर हजर होण्यासाठी या कारणांसाठी हे परवाने त्या त्या जिल्ह्यांतून जिल्हाधिकारी अथवा पोलीस आयुक्त देतात. आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे जिल्ह्याच्या सीमेवर तापमान तपासून, नोंद करून त्यांना

सरकारी रुग्णालयात पाठविले जाते. तेथे वैद्यकीय तपासणी करून आवश्यकता भासल्यास स्राव घेतला जातो, अन्यथा संस्थात्मक किंवा घरी विलगीकरण केले जाते. एखादी व्यक्ती रुग्णालयात पोहोचली की नाही हे पडताळले जाते.यामध्ये काही त्रुटी असल्या तरी त्या सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, पण या सर्वांमध्ये हे लक्षात आले की, आपण एखाद्या बेटाप्रमाणे राहू शकत नाही. आपण काही स्वयंपूर्ण नाही अथवा होऊही शकत नाही. आपला शिरोळ तालुका सांगलीशी, सांगलीचा शिराळा तालुका शाहूवाडीशी, आपले चंदगड बेळगावशी एवढे जोडलेले आहे की, तेथे जिल्हा हा घटक लागू करताना अनेक व्यावहारिक अडचणी येतात. त्यामुळे आपल्याला काही धोके स्वीकारावे लागत आहेत.

अशा काळात आपले उद्दिष्ट कोरोनामुक्ती किंवा ग्रीन झोन न राहता, आपल्याला कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू कसा होणार नाही, केसेसचे प्रमाण कमीत कमी राहील जेणेकरून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे रुग्ण सापडण्यापेक्षा जास्त राहील, आपली आरोग्य व्यवस्थाही कोलमडणार नाही, सामूहिक संसर्ग होणार नाही, आपली अर्थव्यवस्थाही रुळावर येण्यास प्रारंभ होईल, अशी असली पाहिजेत. आपण ग्रीन झोनमध्ये गेलो म्हणून आनंद साजरा करण्याची गरज नाही आणि मुंबईवरून आलेली व्यक्ती कोरोनाबाधित निघाली म्हणूनही आदळाआपट करून घेण्याची गरज नाही.

अनेक गावांमध्ये तर मुंबईहून आलेल्या व्यक्तीला अतिशय तिरस्काराची वागणूक मिळत आहे. शेवटी हा आपलाच देश आणि आपलाच महाराष्ट्र आहे. ही मुंबईही आमचीच आहे, तिला गुणदोषासह स्वीकारले पाहिजे. शास्त्रज्ञांना लस अथवा गुणकारी औषध मिळेपर्यंत आपल्याला कोरोनासह जगायचे आहे, आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून स्वीकारायचे आहे. शेवटी ‘आरोग्य आणि अर्थव्यवस्था’ ही आपल्या गाडीची दोन चाके आहेत. दोघांचेही संतुलन ठेवत, नेहमीपेक्षा कमी वेगाने, अडखळत का होईना, मात्र जिद्दीने आणि कोरोनाला हरविण्याच्या निर्धारानेच आपण पुढे वाटचाल केली पाहिजे. या संकटातही निर्माण होणाऱ्या नव्या रोजगार व उद्योगाच्या संधी शोधल्या पाहिजेत.

 

डॉ. अभिनव देशमुख

पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस