शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सुरळीत पाणीपुरवठ्याला गळत्यांचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:27 IST

कोपार्डे : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला विविध ठिकाणी वारंवार गळती लागत असल्यानेच शहरात बहुतांशवेळा पाणीपुरवठा यंत्रणा कोलमडून ...

कोपार्डे : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला विविध ठिकाणी वारंवार गळती लागत असल्यानेच शहरात बहुतांशवेळा पाणीपुरवठा यंत्रणा कोलमडून पडते. यातून अनेक भागांमध्ये नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. त्यामुळे पाईपलाईनला वारंवार होणाऱ्या गळत्यांकडे पाणीपुरवठा विभाग दुर्लक्ष का करतो, असा प्रश्न निर्माण होत आहे. शहरात बालिंगा व नागदेववाडीतील पंपिंग स्टेशनपासून चंबुखडी व पुईखडी पाण्याच्या टाकीपर्यंतच्या पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळत्या आहेत. यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. विशेष म्हणजे गेल्या कित्येक दिवसांपासून येथे गळती असूनही प्रशासनाकडून या गळत्या काढण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे येथे वाया जाणारे लाखो लिटर पाणी वेळीच थांबवले तर शहरात सुरळीत पाणीपुरवठा करणे प्रशासनालाही शक्य होणार आहे.

चौकट : तर यंत्रणा उंचीवर ठेवणे गरजेचे

प्रत्येक महापुरावेळी पंपिंग स्टेशनमधील विद्युत मोटर, पॅनेल, स्टार्टर व विद्युत पुरवठा करणारे मोठे ट्रान्सफॉर्मर पाण्यात जाऊन शहराचा पाणीपुरवठा चार ते आठ दिवस बंद ठेवण्याची वेळ येते. पाणीपुरवठा खंडित झाला की, यंत्रणा पाण्यात बुडाली आहे हे ठरलेले उत्तर प्रशासनाकडून नेहमीचे दिले जाते. मात्र, त्यावर कायमस्वरूपी उपाय काढला जात नाही. गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता कोल्हापुरात महापूर आता नित्याचा झाला आहे. त्यामुळे या काळात शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवायचा असेल तर ट्रान्सफॉर्मर व पाणीुपरवठा यंत्रणा सुरक्षित उंचीवर ठेवणे गरजेचे आहे.

चौकट : कोट्यवधीची यंत्रणा...पण सुरक्षित आहे का

शहराला पाणीपुरठा करणाऱ्या पंपिंग स्टेशनवर आधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बसवून जास्तीत जास्त ॲटोमायझेशन करण्यात आले आहे, पण कोट्यवधींची ही यंत्रणा सुरक्षित आहे का याबाबत शंकाच आहे. बालिंगा व नागदेववाडीतील इलेक्ट्रिक यंत्रणेत बदल करून नवीन अत्याधुनिक संगणकीय इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. पुणे येथील कंपनीकडून बालिंगा पंपिंग स्टेशनवर अडीच कोटींचे पॅनेल बसवण्यात आले, तर रॉ वॉटर येथेही नवीन पॅनेल बसविले आहेत. मात्र, या पॅनेलच्या सुरक्षेसाठी गांभीर्याने पाहिले जात नाही. मुसळधार पावसात या नवीन पॅनेलवर गळती लागली होती. कर्मचाऱ्यांनी यावर ताडपत्री टाकून पाण्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. हे इलेक्ट्रिक पॅनेल असल्याने त्याच्या सुरक्षेसाठी सुसज्ज केबिन असायला हव्यात, पण याकडे दुर्लक्ष होत आहे.