शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी ‘जीआय’ मानांकनानुसारच गूळ बनवावा, गणेश हिंगमिरे यांचे आवाहन : बाजार समितीत गूळ विषयावर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 1:28 PM

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या गुळाला मानांकन मिळवून देण्यासाठी बाजार समितीच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘जीआय’ मानांकनानुसार गूळ बनविला तरच त्याला चांगला भाव मिळू शकेल, असा विश्वास शेतीमाल व्यवस्थापन अभ्यासक गणेश हिंगमिरे यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांनी ‘जीआय’ मानांकनानुसारच गूळ बनवावा, गणेश हिंगमिरे यांचे आवाहन बाजार समितीत गूळ विषयावर कार्यशाळागुळात साखर घालण्याचे प्रकार टाळावेत

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या गुळाला मानांकन मिळवून देण्यासाठी बाजार समितीच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘जीआय’ मानांकनानुसार गूळ बनविला तरच त्याला चांगला भाव मिळू शकेल, असा विश्वास शेतीमाल व्यवस्थापन अभ्यासक गणेश हिंगमिरे यांनी व्यक्त केला.कोल्हापुरात बाजारसमितीत ‘कोल्हापुरी गुळाला जीआय मानांकन’ या विषयावर गूळ उत्पादकांची कार्यशाळा आयोजित केली होती. त्यामध्ये पुण्याचे तज्ज्ञ हिंगमिरे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद लाभला.हिंगमिरे म्हणाले, कोल्हापुरी गुळाला पूर्वापार परंपरेनुसार चांगली मागणी आहे. कोल्हापूर जिल्ह्याभोवतीच्या नद्यांमुळे येथील जमिनीची सुपिकता अधिक आहे. परिणामी, ऊस उत्पादन चांगले होते, उताराही चांगला होतो, त्यामुळे असा ऊस गूळ बनविण्यास उपयुक्त आहे.

या भौगोलिक परिस्थितीनुसार गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने लाभ उठवावा. त्यातून कोल्हापूरच्या गुळाला आधिकाधिक भाव मिळू शकेल तसेच ‘जीआय’ (केंद्राच्या अटीप्रमाणे) चा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने गूळ बनविण्याच्या प्रक्रियेसाठी घालून दिलेल्या अटी, नियमांचे शेतकऱ्यांनी पालन करावे, असेही ते म्हणाले.गुळात वापरले जाणारे रसायन, आर्द्रता यांचे निकषही नियमांनुसारच पाळावेत, असे सांगून हिंगमिरे म्हणाले, ऊस लागवडीपासून ते गूळ बनविण्यापर्यंतची प्रक्रिया ‘जीआय’ नियमानुसार झाल्यास गूळ जास्तीत-जास्त दर्जेदार बनून भावही चांगला मिळेल. ही प्रक्रिया एका शेतकऱ्यांला शक्य नसली तरीही शेतकऱ्यांनी सामुदायिक पद्धतीने गूळ उत्पादन घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.या कार्यशाळेस बाजार समितीचे उपसभापती अमित कांबळे, संचालक परशुराम खुडे, बाबासाहेब खोत, उपसचिव मोहन सालपे, सचिव दिलीप राऊत आदी उपस्थित होते.गुळात साखर घालण्याचे प्रकार टाळावेतहिंगमिरे म्हणाले, अलीकडच्या काळात गूळ बनविताना त्यात साखर घालण्याचे प्रमाण वाढले आहे, पण साखर घालून बनविलेला गूळ हा ‘जीआय’ प्रमाणित मानला जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी असे प्रकार टाळावेत, असेही त्यांनी आवाहन केले. 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डkolhapurकोल्हापूर