शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत मतदानात पुन्हा कोल्हापूरच भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:20 IST

कोल्हापूर : राज्यात १२ हजार ६०३ ग्रामपंचायतीसाठी इर्षेने व चुरशीने ७६ .२५ टक्के मतदान झाले असून मतदानात कोल्हापूरच पुन्हा ...

कोल्हापूर : राज्यात १२ हजार ६०३ ग्रामपंचायतीसाठी इर्षेने व चुरशीने ७६ .२५ टक्के मतदान झाले असून मतदानात कोल्हापूरच पुन्हा भारी ठरले आहे. लोकसभा, विधानसभेपाठोपाठ ग्रामपंचायत निवडणुकीतही कोल्हापूरात सर्वाधिक ८३.८० टक्के मतदानाची नोंद झाली. सर्वात कमी ६८.२१ टक्के रत्नागिरी जिल्ह्यात मतदान झाले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतील सर्वात संघर्षपूर्ण निवडणूक म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. नात्यागोत्यासह, भाऊबंदकी उफाळून येत असल्याने सर्वच ठिकाणी संघर्षपूर्ण निवडणुका झाल्याचे पहावयास मिळाले. राज्यातील १२ हजार ६०३ ग्रामपंचायतीच्या ४६ हजार ९२१ प्रभागातील १ लाख २५ हजार ७०५ जागांसाठी दुरंगी, तिरंगी लढती झाल्या. शुक्रवारी राज्यात सगळीकडेच अतितटीने मतदान होऊन १ कोटी ६९ लाख ११ हजार ३९५ मतदारांनी हक्क बजावला.

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ८३.८० टक्के मतदान झाले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही राज्यात सर्वाधिक मतदानाची नोंद कोल्हापूरात झाली होती. त्याची पुनर्रावृत्ती ग्रामपंचायत निवडणुकीत झाली. त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात ८३.५८ टक्के, भंडारा जिल्ह्यात ८२.९५ टक्के तर परभणीमध्ये ८२.९३ टक्के मतदान झाले.

‘भंडारा-गोंदियात’ महिलाराज

ग्रामपंचायतीसाठी एका एका मतासाठी उमेदवारांचे शेवटपर्यंत प्रयत्न सुरू राहिल्याने मतदान चांगले झाले. मात्र भंडारा व गोंदिया जिल्ह्यात पुरूषांपेक्षा महिलांचे मतदान अधिक होते. पुरूषांच्या तुलनेत भंडारात ३६४३ तर गोंदियात ५१० महिलांचे जादा मतदान झाले.

आडाखे बांधण्यात उमेदवार गुंग

राज्यातील ४६ हजार ९२१ प्रभागात २ लाख १४ हजार ८८० उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रणा बंद झाले असून प्रत्येक ठिकाणी चुरस निर्माण झाल्याने उमेदवारांचे जीव टांगणीला लागले आहेत. कोणत्या घरातील मतदान आपणाला झाले, कोणाचे झाले नाही,यावरून विजयी, पराजयाचे आडाखे बांधण्यात उमेदवारांसह त्यांचे समर्थक गुंग आहेत.

असे झाले जिल्हानिहाय मतदान

जिल्हा मतदानाची टक्केवारी

कोल्हापूर ८३.८०

बीड ८३.५८

भंडारा ८२.९५

परभणी ८२.९३

अहमदनगर ८२.७३

हिंगोली ८२.३२

जालना ८२.३२

दृष्टीक्षेपात राज्यातील निवडणूक

ग्रामपंचायती- १२ हजार ६०३

प्रभाग - ४६ हजार ९२१

जागा - १ लाख २५ हजार ७०५

बिनविरोध - २६ हजार ७१८

उमेदवार रिंगणात - २ लाख १४ हजार ८८०