शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

त्रिसूत्रीवर भारताचा आर्थिक विकास

By admin | Updated: August 3, 2014 01:46 IST

यशवंत थोरात : यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास स्कूलतर्फे व्याख्यान

कोल्हापूर : आर्थिक स्थैर्य, सर्वसमावेशक वृद्धी आणि सुशासन या त्रिसूत्रीच्या आधारावरच भारताचा सर्वंकष आर्थिक विकास साधता येऊ शकेल, असे प्रतिपादन ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. वाय. एस. पी. थोरात यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास स्कूलतर्फे आज, शनिवारी आयोजित ‘महत्त्वाकांक्षी भारतासाठी आर्थिक कार्यक्रम’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते. डॉ. थोरात म्हणाले, आर्थिक स्थैर्य हा कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा मूलभूत पाया आहे. नियंत्रण, चलन मजबुती आणि व्याजदरावर नियंत्रण या तीन बाबींच्या योग्य संतुलनातून आर्थिक स्थैर्य व वृद्धिवाढ होऊ शकते. पुढच्या दहा वर्षांत भारताचा महासत्ता नव्हे, तर किमान मध्यम उत्पन्न गटात समाविष्ट व्हावा, यासाठी आजचा दरडोई वृद्धिदर १६०० डॉलर्सवरून ९००० डॉलर्सवर न्यावा लागणार आहे. यावरून आपल्यासमोरील आव्हानांची कल्पना येईल. त्याचप्रमाणे १९५० पासून आपण सामाजिक न्यायाधिष्ठता व सर्वसमावेशक वृद्धीचा पुरस्कार केला आहे. मूठभरांचे वृद्धीचे धोरण स्वीकारले तर राष्ट्राचे स्थैर्य धोक्यात येईल. त्याचप्रमाणे पारदर्शकता, विश्वासार्हता आणि निर्णय प्रक्रियेमध्ये शेवटच्या घटकाचा समावेश या तीन गोष्टींवर आधारित सुशासनाचा अंगीकार केला तरच विकास कार्यक्रमाला योग्य दिशा मिळेल. डॉ. थोरात पुढे म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांत भारत आणि भारतीयांच्या एकूणच जीवनप्रणालीला वळण देणाऱ्या घटकांचा सविस्तर आढावा घेतला. त्यामध्ये जागतिकीकरणामुळे सरकारकडून बाजाराकडे सरकलेली अर्थव्यवस्थेची सूत्रे, नागरिकांचा सरकारवरील वाढत असलेला प्रभाव, राष्ट्रीय राजधानीकडून राज्यांच्या राजधानीकडे सरकलेला प्रभाव, बिंदूशोषित घटकांमध्ये हक्कांसाठी झालेली जाणीवजागृती, तरुणांची वाढलेली लक्षणीय संख्या, महिला घटकांचा वाढता प्रभाव, शांतिप्रिय भारताला ग्रासलेला दहशतवाद आणि तटस्थ भारताचे बदललेले बहुसहयोगी परराष्ट्र धोरण या आठ घटकांचा मोठा प्रभाव भारताच्या आर्थिक कार्यक्रमावर पडणार आहे. डॉ. पवार म्हणाले, मूल्याधिष्ठित शिक्षणप्रणाली प्रशिक्षण कार्यक्रम राबवूनच भारतीय तरुणांना विकासाभिमुख दिशा देण्याची गरज आहे. तरुणाईच्या बळावर देशाला अर्थिक प्रगतिपथावर नेण्यासाठी आपण कोणते प्रयत्न करणार आहोत, याबद्दल जबाबदारीने विचार केला पाहिजे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, ए. बी. राजगे, डॉ. डी. व्ही. मुळे, यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास स्कूलचे संचालक डॉ. व्ही. बी. जुगळे यांनी स्वागत केले; तर कविता वडाळी यांनी परिचय करून दिला. (प्रतिनिधी)