शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट कोल्हापूर’साठी मी वचनबद्ध : सतेज पाटील

By admin | Updated: October 31, 2015 00:24 IST

‘फिरंगाई’ला ‘स्मार्ट’ करण्यासाठी तेजस्विनी इंगवलेंची गरज : पाटील

कोल्हापूर : अंबाबाईचा लाभलेला आशीर्वाद आणि शाहू महाराजांचे समतेचे विचार पुढे जपणाऱ्या आपल्या कोल्हापूरला पुढे न्यायची जबाबदारी माझी आहे. कोल्हापूरकरांच्या मनातलं ‘स्मार्ट कोल्हापूर’ घडविण्यासाठी मी वचनबद्ध आहे, असे प्रतिपादन सतेज पाटील यांनी केले. रमणमळा येथील काँग्रेसचे उमेदवार संदीप ऊर्फ पप्पू सरनाईक यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते.सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूरला स्मार्ट बनविण्यासाठी गेल्या पाच वर्षांत पायाभूत सुविधांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केले. स्वच्छ व मुबलक पाणी देणारी योजना येणाऱ्या दोन वर्षांत पूर्ण करणारच, हा माझा निर्धार आहे. ‘ई गव्हर्नस’च्या माध्यमातून मोबाईल अ‍ॅपद्वारे महापालिकेचा कारभार लोकाभिमुख करणार आहे. तरुणांसाठी रोजगार, वाय-फाय सिटी, मल्टिलेवल पार्किंग, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सुरक्षित शहर, महिलांसाठी स्वच्छतागृहे, कचरामुक्त शहर, वाहतुकीचे नियोजन याला प्राधान्य असेल. ज्यांच्यासाठी मते मागायला मी तुमच्याकडे आलो. त्यांनी निवडणुकीनंतर तुमच्यासाठी सदैव उपलब्ध असायला हवे हा माझा आग्रह आहे. त्यासाठी निवडणुकीनंतर ज्या वॉर्डात काँग्रेसचे नगरसेवक निवडून येतील, त्या ठिकाणी प्रत्येक सहा महिन्याला वॉर्ड मिटिंग घेऊन नगरसेवकांनी काय काम केले?, जनतेच्या काय सूचना आहेत, हे जाणून घेणार आहे. या प्रत्येक मिटिंगला मी स्वत: उपस्थित राहीन. कोल्हापूरच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून माझ्यासारखा तरुण काम करत आहे. आजपर्यंत जनतेचे आशीर्वाद, प्रेम, पाठबळ मला लाभले आहे. तुमच्यासारखी जोडलेली माणसे हेच माझे आयुष्याचे संचित आहे. आपणा सर्वांच्या सहकार्याने कोल्हापूरला पुढे घेऊन जाण्याची माझी प्रबळ इच्छा आहे. यासाठी काँग्रेस पक्षाला बहुमत द्या, असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले. सुरेश कुराडे म्हणाले, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती हे काँग्रेससोबतच आहेत. मात्र, विरोधक त्यांच्याबाबत गैरसमज पसरवत आहेत. यावेळी सुरेश उलपे, सुरेश कुसळे, श्रीनिवास सोरटे यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते.‘फिरंगाई’ला ‘स्मार्ट’ करण्यासाठी तेजस्विनी इंगवलेंची गरज : पाटीलकोल्हापूर : शिवाजी पेठ परिसरातील फिरंगाई प्रभाग क्र. ४७ मधून विद्यमान नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी आपल्या दोन तपांतील नगरसेवकपदाच्या कार्याच्या जोरावर पुन्हा एकदा आपल्या पत्नी तेजस्विनी इंगवले यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. फिरंगाई परिसर ‘स्मार्ट’ व्हावा, असे नागरिकांना वाटत असल्यानेच इंगवले यांच्या पत्नी तेजस्विनी इंगवले यांना प्रभागातील नागरिकांचा पाठिंबा वाढत आहे, असे उद््गार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले.हा प्रभाग महिलांसाठी राखीव झाला नसता तर रविकिरण इंगवले यांनी येथून विजयाची हॅट्ट्रिक केली असती, असाही विश्वास चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. इंगवले यांनी आजपर्यंत केलेल्या कार्यांच्या जोरावर त्यांच्या मागे परिसरातील सर्व जनता राहणार असल्याचाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रभागात २०१५-२०२० या कालावधीत गांधी मैदानाचे अत्याधुनिकीकरण, गांधी मैदानातील अत्याधुनिक जीम, गांधी मैदान हॉलमध्ये फक्त महिलांकरिता योगासन तसेच निसर्ग उपचार केंद्रांची स्थापना करणे, शिवाजी पेठेत निवृत्ती चौकातील शिवाजी पुतळ्याचे सुशोभीकरण करणे तसेच खरी कॉर्नर, अवचित पीर तालीम परिसर, विद्यार्थी कामगार चौक येथे हायमास्ट लॅम्पच्या उभारणीचा संकल्प असल्याचेही रविकिरण इंगवले यांनी सांगितले. यावेळी ताराराणी आघाडीच आपल्या प्रभागातील जनतेला न्याय देऊ शकेल, असा विश्वास रविकिरण इंगवले यांनी व्यक्त करून पत्नी तेजस्विनी इंगवले यांना मैदानात उतरविल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)