शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कालचे दरोडेखोर आजचे मित्र कसे?

By admin | Updated: May 5, 2015 01:12 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीने जिल्हा बँक, राज्य बँक, महानंद, साखर कारखान्यात केलेल्या घोटाळ्यांचे ट्रॅक्टरभर पुरावे घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीने जिल्हा बँक, राज्य बँक, महानंद, साखर कारखान्यात केलेल्या घोटाळ्यांचे ट्रॅक्टरभर पुरावे घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा नेत्यांनी नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढला होता. आता सत्तेवर आल्यानंतर ते पुरावे कुठे गेले, का त्याची रद्दी घातली, असा सवाल करीत राज्यात विरोधी पक्ष जिवंत ठेवण्याचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे. भाजपा आयतेच सत्तेवर आले असून, त्यांना सहकारातील कालचे दरोडेखोर आता मित्र वाटू लागले आहेत, अशी खरमरीत टीका खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी सांगलीत केली. ‘एफआरपी’साठी सोमवारपासून राज्यभर सहकारमंत्र्यांना जाब विचारणार असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनाचे रणशिंगही फुंकले. स्वाभिमानी संघटनेच्यावतीने रविवारी येथे झालेल्या साखर परिषदेत ते बोलत होते. खा. शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याच्या अटीवर भाजपा सरकारला पाठिंबा दिला होता; पण आमचा भ्रमनिरास झाल्याचे सांगून ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या पैशावर उभे राहिलेले ‘वसंतदादा शुगर’ हे शरद पवार यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे वृद्धाश्रम झाले आहे. या इन्स्टिट्यूटचा शेतकऱ्यांना लाभ झालेला नाही. उलट तेथील शास्त्रज्ञांनी उसाच्या विविध जातींना विरोधच केला आहे. लोकरी माव्यावर प्रतिबंध घालण्यास या शास्त्रज्ञांना का अपयश आले, याचे उत्तर पवारांनी द्यावे. पुढील १० वर्षांतील साखर उद्योगाच्या रोडमॅपचे नियोजन केले; पण त्यात शेतकरी, शेतमजूर, साखर कामगारांना स्थान नव्हते. शरद पवार कृषिमंत्री असताना सहकारी कारखाने खासगी झाले. तेव्हा त्यांनी हे कारखाने वाचविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. भाजपाने एफआरपीच्या नादी लागू नये, त्यांची गाठ शेतकऱ्यांशी आहे, असा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)