शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

शेट्टींची ‘महायुती’ला सुटी?

By admin | Updated: August 24, 2014 00:48 IST

शिवसेनेकडून अवमान : जागा देण्याबाबत ताठर भूमिका

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूरमहाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीपूर्वी आकारास आलेल्या पाच पक्षांच्या महायुतीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. त्याचा महायुतीला चांगलाच दणका बसणार आहे. जागा वाटपांबाबत एक सप्टेंबरपर्यंत काय घडते, हे पाहून त्यासंबंधीचा निर्णय घेण्याचा शेट्टी यांचा विचार असल्याचे त्यांच्या पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. शिवसेना खासदार शेट्टी यांना विधानसभेच्या अवघ्या चार ते पाचच जागा सोडायला तयार आहे. शेट्टी यांनी ३८ उमेदवारांची यादीच महायुतीला दिली आहे. त्यात पुढे-मागे होण्याची त्यांची तयारी आहे; परंतु चार-दोन जागा देणार असाल, तर मग कशाला महायुती, असा संघटनेचा सवाल आहे. त्यातून मुख्यत: शेट्टी व शिवसेना यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. भाजप त्याकडे नुसते लांबून पाहत आहे. महायुतीला आम्ही लोढणे वाटत असेल तर त्यांनी तसे सांगावे, आमचा मार्ग मोकळा असल्याचे शेट्टी यांनी जुलैमध्येच स्पष्ट केले आहे.लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४२ जागांवर दणदणीत विजय मिळाला. त्यामध्ये खासदार शेट्टी यांची जागाही शिवसेनेच्याच कोट्यातील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची लाट निर्माण झाल्यावर हा एकतर्फी निकाल लागला. त्यामुळे विधानसभेला शिवसेना-भाजप हे घटक पक्ष स्वाभिमानीसह रासप व रिपब्लिकन पक्षाच्या आठवले यांना फारसे बेरजेतच धरायला तयार नाहीत. कमी जागा देऊन अपमान करायचा व स्वाभिमानीने आदळआपट करून स्वत:च बाहेर पडावे, असे शिवसेनेचे धोरण दिसत असल्याची संघटनेची तक्रार आहे. शिवसेना नेते रामदास आठवले यांनीही निवडून येण्याच्या क्षमतेवर जागा वाटप होईल. ते संघटनेला मान्य नसेल, तर खासदार शेट्टी यांनी महायुतीत राहायचे की नाही, हे ठरवावे असे काल, शुक्रवारीच मुंबईत जाहीर केले आहे. त्यामुळे संघटनेतील अस्वस्थताही वाढली आहे.शिवसेना संघटनेला कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त शिरोळ व चंदगड या दोनच जागा सोडायला तयार आहे. या दोन जागा संघटनेच्या हक्काच्याच आहेत. त्याबाबत ‘माळावर शंख करायला पाटलांची परवानगी कशाला लागते.’ अशी संघटनेची भूमिका आहे. शेट्टी स्वत: खासदार आहेत व लोकसभेला किमान दहा विधानसभा मतदारसंघात त्यांना व सदाभाऊ खोत यांना मताधिक्क्य मिळाले आहे. लढाऊ कार्यकर्त्यांची फौज हे संघटनेचे बलस्थान आहे. त्यामुळे राज्यातील चार-पाच जागा मिळणार असतील तर त्यापेक्षा स्वतंत्र लढलेले बरे, असा संघटनेचा पवित्रा आहे. त्यादृष्टीने शेट्टी यांनी चाचपणीही सुरू केली आहे. जागा वाटपात सन्मानजनक तोडगा निघाला नाही, तर स्वबळावर लढण्याची संघटनेची तयारी आहे. ऊस आंदोलनातील यशामुळे दक्षिण महाराष्ट्रातील सहा-सात जिल्ह्यांत प्रत्येक मतदारसंघात संघटनेला मानणारा वर्ग तयार झाला आहे. त्यांची निवडून येण्याची क्षमता नसली, तरी त्या मतदारसंघात कुणाचा पराभव करायचा हे ठरविण्याइतकी संघटनेची ताकद आहे. त्यामुळे शिवसेनेमागून फरफटत जाण्यापेक्षा स्वबळावर लढल्यास दोन्ही काँग्रेसमधील नाराजांचाही पाठिंबा मिळू शकतो, असा संघटनेचा होरा आहे.संघटनेची ‘ताकद’ काय...भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी महायुतीत या, असे जाहीर निमंत्रण दिल्याने मी त्यामध्ये सहभागी झालो आहे. त्यामुळे महायुतीला आता जर आम्ही नको असेल, तर त्यांनी तसे स्पष्टपणे सांगावे. जबरदस्तीने कुणाच्या गळ्यात पडण्याचा आमचा स्वभाव नाही. संघटनेची आतापर्यंतची सगळी वाटचाल स्वबळावर झाली आहे, हे आमची ताकद विचारणाऱ्यांनी विसरू नये.- खासदार राजू शेट्टीअध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना४राष्ट्रवादी काँग्रेसवर आक्रमक हल्ला४शेट्टी यांचे स्वच्छ चारित्र्य४लढाऊ कार्यकर्ते४ऊस आंदोलनातील यश४ग्रामीण प्रश्नांची चांगली जाण४मुंडे यांच्या निधनानंतर महायुतीकडे शेट्टी यांच्याशिवाय ग्रामीण भागात प्रभाव असलेला नेता नाही.