शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भोंदूगिरीचे बिंग फुटू नये म्हणून अपहरण

By admin | Updated: May 11, 2015 00:58 IST

कांबळीची कबुली : अपहृत बालकाची मावशी ताब्यात

अडरे/चिपळूण : भोंदूगिरीचे बिंग फुटू नये व माउलीच्या करिष्म्याचा भक्तगणांवर प्रभाव पडावा, शिवाय आपल्यापासून दूर गेलेला भक्त पुन्हा आपल्या प्रवाहात यावा, यासाठी कापसाळ फणसवाडी येथील तथाकथित मठाधिपती वासंती कांबळी हिने आपल्या सहकाऱ्यांसह कामथे हुमणेवाडी येथून ७ वर्षीय बालकाचे बुधवारी अपहरण केले होते. तपासात याबाबतची कबुली कांबळी हिने पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तिघांना रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. १५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, याप्रकरणी आणखी एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कामथे हुमणेवाडी येथून प्रथम प्रकाश बाईत हा बालक बुधवारी दुपारी आपल्या घरातून बेपत्ता झाला होता. गुरुवारी कलावती आर्इंच्या मठात प्रश्नोत्तराच्यावेळी कामथे येथील महिलांनी प्रथम बेपत्ता झाला असल्याचे सांगितले. त्यावर वासंतीने मुलगा चार दिवसांत परत येईल आणि त्याला मीच सुरक्षित आणेन, असे सांगितले. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मठाधिपती वासंती वसंत कांबळी (कापसाळ फणसवाडी), परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल अलोरेचे शिक्षक मधुकर गणपती चिंदके (हळदी, कोल्हापूर) यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. ते दोघे कोल्हापूर येथे फरशी आणण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले. मोबाईलवरून त्यांचे लोकेशन समजले. त्यानुसार पोलिसांनी चिंदके याला भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून चिपळूण पोलीस ठाण्यात बोलविले. शुक्रवारी सायंकाळी माउली कांबळी व शिक्षक चिंदके पोलीस ठाण्यात आले. यावेळी काही काळ हंगामा करण्यात आला. पोलिसांच्या नावे तळतळाटही झाला, परंतु पोलिसांनी कसून चौकशी केली व रात्री चिंदके व माउली कांबळी यांना उशिरा अटक केली. आपला भक्तसंप्रदाय वाढावा व प्रथमचे वडील पुन्हा प्रवाहात सामील व्हावेत, आपले बिंग कुठे फुटू नये यासाठी माउली कांबळीचा आटापिटा होता. म्हणूनच तिने हे अपहरण नाट्य घडवून आणले होते. पोलिसांनी शनिवारी प्रथमला रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथून चिपळूण येथे आणले व त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. रविवारी याप्रकरणी सूरज दळवी (कामथे) याला अटक केली, तर मंगला प्रभाकर जावळे (४७, कामथे, जावळेवाडी) या महिलेला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. तिघा आरोपींना रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दि. १५पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रथमला त्याची मावशी मंगला जावळे हिने घरातून खाऊचे आमिष दाखवून महामार्गापर्यंत आणले असावे, असा संशय असून, तिने त्याला आरोपी सूरज दळवी याच्या स्वाधीन केले. सूरज याने संगमेश्वर, कोल्हापूर मार्गे मुंबईला कुर्ला येथे त्याला नेले. तेथे त्याने त्याला एका महिला भक्तगणाच्या स्वाधीन केले. या महिलेने प्रथमला शिक्षक चिंदके याच्या स्वाधीन केले. त्याने रेठरे बुद्रुक येथे त्याला बहिणीकडे ठेवले. तथाकथित माउली कलावती आईची भक्त वासंती कांबळी हिचा पाच हजार भक्तगण आहे. हा भक्तगण वाढावा यासाठी आपल्यात दैवी शक्ती आहे, ती सिद्ध व्हावी हे दाखविण्यासाठी व आपला मायावी पाश भक्तगणांच्या भोवती आवळण्यासाठी आपल्या शक्तीच्या जोरावर आपण प्रथम याला परत आणला हे दाखविण्यासाठी कांबळी हिने हा सर्व अपहरण नाट्याचा आटापिटा केला. प्रकाश बाईत यांना अद्दल घडविण्यासाठीच प्रथमचे अपहरण प्रकाश बाईत हे वासंती कांबळी यांच्याकडे गेल्या आठ-नऊ वर्षांपासून त्यांच्या कामथे फणसवाडी येथील असणाऱ्या मठात भक्त म्हणून सेवा करीत होते. कामथे येथे असणाऱ्या नदीपात्रात कलावती आर्इंच्या पाऊलखुणा आहेत, त्या तेथून येऊन गेल्या आहेत, अशी वासंती कांबळी ही भक्तगणांना भासवत होती व त्यांची दिशाभूल करीत होती. हे पाऊल बोगस असल्याचे समजल्यानंतर गेल्या सात-आठ महिन्यांपासून प्रकाश बाईत तेथे जाण्याचे बंद झाले. प्रकाश यांच्यामुळे आपले बिंग फुटेल व आपली नाचक्की होईल, आपल्या भोंदूगिरीचा बुरखा फाटेल म्हणून त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्याचा तिने प्रयत्न सुरू केला. परंतु, त्यांनी दाद दिली नाही. प्रकाश यांना अद्दल घडविण्यासाठी भक्तगण बळकट करण्याच्या उद्देशाने त्यांच्या मुलाचे वासंतीने अपहरण केले, असे उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे यांनी सांगितले. स्थानिक महिलांकडून समर्थन कापसाळ फणसवाडी येथे सिद्धकला मठाला भेट दिली असता तेथील स्थानिक महिला गोळा झाल्या. त्यांनी आमची माउली चांगली आहे. तिला बदनाम करण्यासाठी प्रकाश बाईत याने षड्यंत्र रचले आहे. उलट तो येथे येणाऱ्या भक्तांकडून उसनवारी पैसे घेत असे. हे न आवडल्याने माउलीने त्याला येथे येण्यास बंदी केली, असे सांगून माउलीचे समर्थन केले.