शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

दादा, गाठ बळिराजाशी...

By admin | Updated: October 17, 2015 00:18 IST

राजू शेट्टींचा सहकारमंत्र्यांना इशारा : शरद पवार गुरू नव्हे ‘भस्मासूर’ : सदाभाऊंचा हल्ला

कोल्हापूर : ‘एफआरपी’ कायद्यात दुरुस्ती करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अभ्यास करून बोलावे. आमच्या वाट्याला येऊ नका; अन्यथा गाठ बळिराजाशी आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला.‘स्वाभिमानी’च्यावतीने शुक्रवारी एकरकमी ‘एफआरपी’साठी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर विराट इशारा मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये खासदार शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. खासदार शेट्टी म्हणाले, एकरकमी ‘एफआरपी’बाबत सहकारमंत्र्यांनी चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, अभ्यास करून बोलावे. सल्ला अनेकजण देतात, त्यामुळे नीट ऐकून बोला; अन्यथा घोटाळा होईल. तोंडाला येईल ते बोलू नका, गाठ बळिराजाशी आहे. राजू शेट्टी विष्णूचा अवतार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ देण्याचे काम त्यांनी करावे, असे सहकारमंत्री म्हणत आहेत, या वाक्याचा खरपूस समाचार घेत, मला विष्णू किंवा राक्षस म्हणा; पण दादा, शेतकऱ्यांच्या वाट्याला जाऊ नका; अन्यथा मला राक्षसासारखे वागावे लागेल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला. ‘राजारामबापू’ने ‘एफआरपी’मधून १४३ रुपये, ‘छत्रपती-पुणे’ने १०० रुपये, ‘मोहनराव शिंदे’ने १४३ रुपये, ‘हुतात्मा’ने १०० रुपये कपात केली आहे. शेतकऱ्यांची सहमती न घेताच ही बेकायदेशीर कपात केली आहे. साखर जीवनावश्यक वस्तूमध्ये येत असल्याने ‘एफआरपी’शी छेडछाड केल्याने संबंधितांवर फौजदारी दाखल करा. तसेच संबंधित बॅँकांच्या व्यवस्थापकांवर कारवाई करण्यासाठी रिझर्व्ह बॅँकेकडे पाठपुरावा करणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर थेट हल्ला चढवत सदाभाऊ खोत म्हणाले, आमचे सहकारमंत्री हे शरद पवार यांना आपले गुरू मानत आहेत. दादा, पवार गुरू नव्हेत, तर ‘भस्मासूर’ आहेत. शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे तुमचे गुरू कसे होऊ शकतात? दादा, साखरसम्राटांना वटणीवर आणण्यासाठी राजू शेट्टींच्या हातात काठी द्या. मुख्यमंत्री ऐकत नाही म्हटल्यावर शरद पवार यांनी लॉबिंग सुरू केले आहे. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घालवायचे आहे. दादा, पवार साहेबांच्या नादाला लागून शेतकऱ्यांना अंगावर घेऊ नका. आम्ही अनेकांचे जळण केले, याचे भान ठेवा, असा इशारा देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने राहावे. तुमच्या खुर्चीला धक्का लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) ंस्वाभिमानीचा मोर्चा : राष्ट्रवादी दिसणार नाही सोसायटीमधील लाख-दोन लाखांच्या घोटाळ्याबद्दल सहा महिने तुरुंगात जावे लागते; पण कोल्हापूर जिल्हा बॅँकेत दोनशे कोटींचा घोटाळा करणारे मोकाट सुटले आहेत. जिल्हा बॅँकेची चौकशी लावा. त्यांच्या बोलत्या बंद होतील. साखर कारखान्यांची विक्री कोणी केली, कोणी खरेदी केली, याची चौकशी केली, तर राष्ट्रवादीचे कसपटही राज्यात दिसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.