शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

गड-किल्ल्यांसाठी शासनाचा पुढाकार हवा

By admin | Updated: January 20, 2015 00:06 IST

जयसिंगराव पवार : पन्हाळ्यातील दुर्ग स्थापत्य परिषदेचा समारोप, संशोधक, स्थापत्य अभियंते, दुर्गप्रेमींकडून मार्गदर्शन

पन्हाळा : छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास भावी पिढीला कळण्यासाठी किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन आवश्यक असल्याची अपेक्षा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केली. दुर्गस्थापत्य परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.दि. १७ व १८ जानेवारी असे दोन दिवस ही परिषद आयोजित केली होती. यात देश आणि राज्य पातळीवरील शंभरांहून अधिक संशोधकांनी सहभाग नोंदवला होता.यावेळी डॉ. पवार म्हणाले, प्राचीन काळी वास्तूशास्त्र अधिक प्रगत आणि कुशल असे होते. त्यामुळेच एवढ्या अवाढव्य वास्तू उभारल्या गेल्या. त्या तंत्रज्ञानाच्या बळावरच या वास्तू शेकडो वर्षांनंतर टिकून आहेत. त्या टिकून राहण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले पाहिजेत.पहिल्या दिवशी डॉ. जय सामंत, स्थापत्य अभियंते इंद्रजित नागेशकर, प्रसाद मेवेकारी, सचिन जोशी, उदय गायकवाड यांची पर्यावरण, दुर्ग संवर्धन, पर्यटन, गड-किल्ल्यांचे प्रकार, त्यांची शैली, स्थापत्य कला, आदी विषयांवर मार्गदर्शन केले. संयोजक अमर आडके यांनी परिषद घेण्याचा हेतू स्पष्ट केला. उद्घाटनावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी किल्ले संवर्धनासाठी लोकसहभागाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.दुसऱ्या दिवशी प्र. के. घाणेकर यांनी शिवनिर्मित जलदुर्गांसह डोंगरी गड-किल्ल्यांची माहिती दिली. अभिजित वेल्हेकर यांनी लेण्यांची माहिती दिली, तर नाशिकच्या संजय अमृतकर यांनी टिपलेल्या अप्रतिम छायाचित्रांमधून विविध गड-किल्ले पाहता आले. दोन दिवसीय दुर्गस्थापत्य परिषदेत दुर्ग अभ्यासक इतिहास संशोधक, पर्यावरणप्रेमी, इतिहासप्रेमी, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमास संजीवन नॉलेज सिटीचे पी. आर. भोसले, नगराध्यक्ष आसिफ मोकाशी, संयोजक अमर आडके, महेश जाधव, हिल रायडर्सचे प्रमोद पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)परिषदेने सहमत केलेले ठराव...किल्ल्यांवर मोबाईल टॉवर, खाणी, हॉटेल, आदींवर बंदी आणावी.केंद्राच्या अखत्यारित नसणारे गड, किल्ले राज्यांना हस्तांतरित करावेत.दुर्ग दत्तक घेऊन त्यांचे जतन व संवर्धन करावे.संवर्धनासाठी जनतेचा सहभाग वाढवून समिती नेमावी.