शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांत गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:23 IST

कोल्हापूर : गॅस सिलिंडरचे दर महिन्याला वाढत असून गेल्या दोन महिन्यांत त्यात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. एकीकडे कोरोनाने ...

कोल्हापूर : गॅस सिलिंडरचे दर महिन्याला वाढत असून गेल्या दोन महिन्यांत त्यात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. एकीकडे कोरोनाने झालेले आर्थिक नुकसान, जीवनावश्यक साहित्यांचे वाढते दर यामुळे आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना दर १५ दिवसांनी केली जाणारी ही दरवाढ म्हणजे नागरिकांना सिलिंडरची सवय लावून त्यांच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रकर आहे. केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून सातत्याने गॅस सिलिंडरचे दर वाढत आहेत. सुरुवातील ४०० रुपयांवर असलेला घरगुती गॅस सिलिंडर आता ८८८ रुपयांना झाला आहे. म्हणजे सात वर्षांत तब्बल दुप्पटपेक्षा जास्त रकमेने दर वाढले आहेत. जानेवारीपासून आता आठ महिन्यांत १९१ रुपयांनी सिलिंडरचा दर वाढला आहे. आधीच गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या, व्यवसायाचे नुकसान झाले, हातावरचे पोट असलेल्यांचा रोजगार थांबला. ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्याने स्मार्ट फोनवरचा खर्च वाढला. सगळीकडून अशी आर्थिक कोंडी झाल्याने सर्वसामान्यांची एवढ्या कमी रकमेत घरखर्च भागवताना तारेवरची कसरत होत आहेत. सिलिंडर ही अत्यावश्यक बाब असल्याने त्यावर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत पैसा घालवावा लागतो.

-----------

महिना : सिलिंडरचे दर

जानेवारी : ६९७

४ फेब्रुवारी : ७२२

१५ फेब्रुवारी : ७७२

२५ फेब्रुवारी : ७९७

मार्च : ८२२

एप्रिल : ८१२

जुलै : ८३८

१७ ऑगस्ट : ८६३

१ सप्टेंबर : ८८८

---

सबसिडी झाली बंद

दीड वर्षापूर्वीपर्यंत शासनाकडून गॅस सिलिंडरवर सबसिडी दिली जात होती. ग्राहकाकडून नियमाने पैसे घेतले जात होते. पण सबसिडीची रक्कम खात्यावर जमा केली जात होती. पण आता तीदेखील बंद झाल्याने ग्राहकांना सिलिंडरसाठी पूर्ण पैसे मोजावे लागतात.

--

पूर्वी घराघरांत चुली होत्या. तेव्हा सरकारने गाजावाजा करत महिलांना आम्ही धुरापासून मुक्त करत आहोत, पर्यावरणाचे रक्षण करूया, असं म्हणत उज्वला गॅस योजना सुरू केली. घराघरांत गॅस सिलिंडर आला, चुली पेटवायच्या बंद झाल्या. लोकांना गॅसवर स्वयंपाकाची सवय लावली आणि आता दरवाढ करून पैसे उकळले जात आहेत.

-संगीता दुगाणी, मगदूम कॉलनी, पाचगाव

---

गॅस सिलिंडरही जीवनावश्यक वस्तू आहे, रोज ते पेटवल्याशिवाय घरात अन्न शिजत नाही, याची जाण ठेवून सरकारने गॅस सिलिंडरचे दर कमी ठेवले पाहिजे. उलट दर महिन्याला ते वाढवून सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पाडली आहे. आधीच कोरोनाने आर्थिक आरिष्ट्य आलेले असताना दोनवेळचा घासपण महाग करून ठेवला आहे, कसं जगायचं सर्वसामान्यांनी.

-सुनेत्रा चनवर, साळोखेनगर

--