शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

साखर उत्पादन ४५ टक्क्यांनी घटणार : राज्यातील गळीत हंगामाला शुक्रवारचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 13:00 IST

कोल्हापूर : मंत्री समितीऐवजी खोळंबलेल्या ऊस गळीत हंगामाची कोंडी अखेर सचिव समितीने मंगळवारी फोडली. राज्यपालांच्या उपस्थितीत झालेल्या सचिव समितीच्या ...

ठळक मुद्दे सचिव समितीच्या बैठकीत निर्णय

कोल्हापूर : मंत्री समितीऐवजी खोळंबलेल्या ऊस गळीत हंगामाची कोंडी अखेर सचिव समितीने मंगळवारी फोडली. राज्यपालांच्या उपस्थितीत झालेल्या सचिव समितीच्या बैठकीत येत्या शुक्रवार (दि. २२)पासून गळीत हंगाम सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाले. महापूर आणि अतिवृष्टीमुळे उसाची टंचाई मोठ्या प्रमाणावर भासणार असल्याने यंदाचा हंगाम ७० ते ९० दिवसच चालेल आणि उत्पादनातही तब्बल ४५ टक्क्यांनी घट येईल, असा अंदाजही बैठकीत व्यक्त करण्यात आला.

साखर आयुक्त शेखर गायकवाड, राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर आणासकर, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी राजभवनात बैठक झाली. राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्यासमोर गळीत हंगाम सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय झाला. दरवर्षी सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये मंत्री समितीची बैठक होऊन गाळप हंगामाचा आढावा घेतला जात होता. यंदा मात्र सरकार बरखास्त झाल्याने मंत्री समितीही बरखास्त झाली आहे. नवे सरकार स्थापन झाल्यानंतरच मंत्री समितीची स्थापना होणार आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आणखी चार दिवसांनी एक महिना होणार असला तरी अजूनही सरकार स्थापन झालेले नसल्यामुळे गळीत हंगामाचा निर्णय कोण घेणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर सचिव पातळीवर बैठक घेऊन यातून मार्ग काढण्यात आला.

या संदर्भात गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बैठकीचा तपशील सांगताना येत्या शुक्रवारपासून गळीत हंगाम सुरू करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. ते म्हणाले, राज्यातील १६२ साखर कारखान्यांनी गाळपासाठी परवान्याची मागणी आयुक्त कार्यालयाकडे केली होती. त्यापैकी कोणतीही थकबाकी नसलेल्या १०५ कारखान्यांना गाळप परवाना दिला आहे. या कारखान्यांचा गळीत हंगामाचा मार्ग मोकळा झाला आहे. ५७ कारखान्यांचे गाळप परवाने राखून ठेवण्यात आले आहेत. त्यातही १५ कारखान्यांचा विषय न्यायालयात असल्यामुळे त्यांची सुनावणीही २२ लाच होणार आहे. या सुनावणीनंतरच त्यांच्या गाळप परवान्याचे भवितव्य ठरणार आहे. या कारखान्यांनी ‘एफआरपी’सह अन्य देणी थकवली असल्याचे परवाना प्रस्ताव छाननीत आढळले आहे.हंगाम ७० ते ९० दिवसच चालणारमहापूर, अतिवृष्टी आणि त्यापाठोपाठ परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे यंदा राज्यात उसाची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम केवळ ७० ते ९० दिवसच चालणार आहे. १८० ते २२० दिवस गाळपाचा उच्चांक नोंदविणाऱ्या राज्यातील कारखान्यांचा यंदा गाळप कालावधीचा नीचांक होणार आहे.४९ लाख मेट्रिक टनांनी उत्पादन घटणारराज्यात यंदा तब्बल ४९ लाख मेट्रिक टनांनी साखरेचे उत्पादन घटेल, असा अंदाज या सचिव समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. गेल्या वर्षी १०७ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले होते, ते यंदा ५८ लाख मेट्रिक टनांपर्यंत खाली येणार आहे. ही घट तब्बल ४५ टक्के आहे. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर