शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
4
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
5
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
6
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
7
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
8
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
9
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
10
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
11
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
12
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
13
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
14
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
15
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
16
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
17
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
18
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
19
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
20
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
Daily Top 2Weekly Top 5

संचमान्यतेचा मार्ग मोकळा

By admin | Updated: August 18, 2015 23:05 IST

कक्ष अधिकाऱ्यांचे पत्र : उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश उठवला

टेंभ्ये : शैक्षणिक वर्ष २०१३-१४पासून प्रलंबित असणाऱ्या संचमान्यतेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाने याबाबतचा स्थगिती आदेश उठवला असून, १३ डिसेंबर २०१३च्या शासन निर्णयाप्रमाणे संचमान्यता करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी याबाबतचे पत्र शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक यांना नुकतेच दिल्याचे समजते.राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पदे रिक्त होणार आहेत की अतिरिक्त ठरणार आहेत हे निश्चित होणार आहे. यामुळे शिक्षक भरतीचा मार्गही मोकळा होण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. गेले अनेक दिवस हा विषय प्रलंबित होता. आता प्रश्न निकाली निघाला आहे.या याचिकेप्रकरणी उच्च न्यायालयाने १२ आॅगस्ट रोजी आदेश दिला आहे. या आदेशानुसार १३ डिसेंबर २०१४ रोजी संचमान्यता जैसे थे ठेवण्याचा आदेश उठवण्यात आला आहे. यामुळे सन २०१३-१४ व सन २०१४-१५ची संचमान्यता १३ डिसेंबर २०१३च्या शासन निर्णयाप्रमाणे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या शासन आदेशानुसार प्राथमिक स्तरावरील शिक्षक निश्चित करण्याबाबतचे निकष करण्यात आले आहेत. पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, तर सहावी ते आठवीच्या वर्गासाठी ३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक निश्चित करण्यात आला आहे. तुकड्यांचा विचार न करता प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावर विद्यार्थी संख्येवर शिक्षक निश्चित करण्यात येणार आहेत. मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार ही रचना निश्चित केली असल्याचे सांगण्यात येत आहे.दि. १३ एप्रिल २०१३च्या शासन निर्णयापूर्वी प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावरील संचमान्यता तुकडीच्या निकषावर करण्यात येत होती. आता यामध्ये शासनाने बदल केला आहे.यापूर्वी प्रत्येक तुकडीसाठी १.२० शिक्षक मंजूर केला जात असे. नवीन धोरणानुसार प्रत्येक तुकडीमागे ०.२० शिक्षक कमी करण्यात येणार आहे. यामुळे अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण अधिक असेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. संघटना स्तरावरून मात्र दि. १३ डिसेंबर २०१३ च्या शासन निर्णयाऐवजी जुन्या पद्धतीनेच संचमान्यता करण्यात यावी, अशी मागणी शिक्षकवर्गातून केली जात आहे. (वार्ताहर)तंतोतंत पालन करणारशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार कोकणासाठी स्वतंत्र निकष वापरुन संचमान्यता करणे आवश्यक आहे. २०१३-१४ व २०१४-१५च्या संचमान्यतेला उच्च न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली आहे. पण, शैक्षणिक वर्ष २०१३-१४मध्ये काही शिक्षणसेवकांना अतिरिक्त ठरवून त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. अशा शिक्षकांना तत्काळ सेवेत घेण्यात यावे, तसेच अतिरिक्त समायोजन निकषाप्रमाणेच केले जावे.- भारत घुले,जिल्हाध्यक्ष, माध्यमिक अध्यापक संघसंचमान्यता करण्यासंदर्भातील आदेश उच्च स्तरावरून मिळताच जिल्ह्यात संचमान्यता शिबिराचे आयोजन करण्यात येईल. मात्र अद्याप याबाबतचे आदेश आलेले नाहीत. यासंदर्भात शासनाने दिलेल्या निकषांचे तंतोतंत पालन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून केले जाणार आहे.- किरण लोहारशिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, रत्नागिरी.