शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल सडतोय 'शेतातच', लाॅकडाऊनचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:23 IST

म्हाकवे : लाॅकडाऊन करण्यापूर्वी शेतकऱ्यांचा उत्पादित होणारा शेतमाल, भाजीपाला, फळे याचे वितरण, विक्री व्यवस्था कोठे करायची, याचा विचारच ...

म्हाकवे : लाॅकडाऊन करण्यापूर्वी शेतकऱ्यांचा उत्पादित होणारा शेतमाल, भाजीपाला, फळे याचे वितरण, विक्री व्यवस्था कोठे करायची, याचा विचारच झालेला नाही. त्यामुळे हे उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत, तर हा नाशिवंत माल असल्याने याचा गैरफायदा घेत व्यापारी कमी किमतीत मागत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. याबाबत ठोस धोरण ठरविणे गरजेचे आहे. अन्यथा हेच लॉकडाऊन शेतकऱ्यांची आर्थिक साखळी विसकटायला कारणीभूत ठरणार असल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत आहेत.

बानगे (ता.कागल) येथिल कलिंगड उत्पादक शेतकरी विजय सुभाष चव्हाण यांनी चार वर्षांपासून कलिंगडसह वांगी, भेंडी आदी भाजीपाला पिके घेतली आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षापासून लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका बसत आहे. गतवर्षी कलिंगड अगदी विनामूल्य देण्याची वेळ आली, तर यंदाही तीच स्थिती आहे.

गत महिन्यात दीड एकरातील कलिंगड अत्यल्प दरात दिले. आता अडीच एकरातील कलिंगड काढणीवर आले आहेत. मात्र, व्यापाऱ्यांनी लाँकडाऊनचे कारण सांगून मालाची उचलच केलेली नाही. त्यामुळे हा माल शेतातच सडत पडला आहे.

रोपाची किंमत तीन आणि कलिंगडची चार..

लाॅकडाऊनमुळे मागणी कमी झाली असल्याचे सांगत व्यापारी चार रुपयांनी प्रतिकिलो कलिंगड मागत आहेत; परंतु एका रोपाची किंमतच ३ रुपये आहे. खते, औषधे, ठिबक यासह एकूण एकरी ७५ हजार खर्च येत आहे. त्यामुळे बँकेकडून घेतलेले कर्ज फिटणार कसे, या विवंचनेत आहे. शेतकऱ्यांबाबत शासनाचे धोरणच नसल्याचे सांगत विजय चव्हाण यांनी संताप व्यक्त केला.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी लारूकडाऊन जाहीर करण्यापूर्वीच पूर्वानुभवावरून यंदा अगोदर शेतमालाच्या विक्रीची व्यवस्था करा. मगच लाॅकडाऊन करा, असे बजावले होते. शासनाने गांभीर्याने घेऊन शेतमालाची विक्री व्यवस्था करावी किंवा पंचनामे करून त्यांना जागेवरच नुकसान भरपाईचा धनादेश द्यावा. याबाबत ठोस निर्णय न झाल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील.

-सागर कोंडेकर

जिल्हा उपाध्यक्ष युवा स्वाभिमानी शेतकरी संघटना

कॅप्शन

बानगे येथील विजय चव्हाण यांनी कलिंगड काढून असा ढीग केला आहे. व्यापारी न आल्याने ताडपदरी, नारळीच्या पानांनी झाकले आहेत.

छाया-दत्तात्रय पाटील