शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीची तयारी पूर्ण

By admin | Updated: September 13, 2014 00:47 IST

जिल्हाधिकारी : जिल्हा निवडणूक यंत्रणा गतिमान

कोल्हापूर : राज्य विधानसभेची निवडणूक जाहीर होताच जिल्हा निवडणूक यंत्रणा गतिमान झाली. १५ आॅक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात आज, शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजल्यापासून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. विधानसभेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होणार असल्याने त्या दृष्टीने सर्व नियोजन करण्यात यावे, अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाने केल्यामुळे निवडणुकीची सर्व कागदोपत्री तयारी पूर्वीच करण्यात आली होती. आज, शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दहा निवडणूक निर्णय अधिकारी उद्या, शनिवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहेत. जिल्ह्यातील दहा मतदारसंघांसाठी लागणारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे यापूर्वीच कोल्हापुरात येऊन पोहोचली असली तरी आणखी जादा यंत्रे पाटणा, बिहार येथून येणार आहेत. निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. त्यांना आवश्यक असलेल्या पंधरा हजार कर्मचाऱ्यांच्याही नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी माने यांनी सांगितले. आचारसंहिता कक्ष, मीडिया सेल तयार केले आहेत. त्याच्या जबाबदाऱ्याही निश्चित केल्या आहेत. आचारसंहिता कक्षाचे काम अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार, तर मीडिया सेलचे काम भूसंपादन अधिकारी संजय पवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. लोकसभा निवडणूक झाल्यापासून आतापर्यंत ४५ हजार मतदारांची नव्याने नोंदणी झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवसापर्यंत ही नोंदणी सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मतदारयादीत गोंधळ राहणार नाही याची प्रशासनातर्फे दक्षता घेतली गेल्याचेही त्यांनी सांगितले. मॉडेल मतदार केंद्रे तयार करण्याच्या सूचना निवडणूक आयोगामार्फत करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जास्तीत जास्त मतदान केंद्रावर चांगल्या सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाल्याने महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती यांना देण्यात आलेली वाहने जमा करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. १५ आॅक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी २० सप्टेंबर रोजी अधिसूचना काढली जाणार आहे. २० ते २७ सप्टेंबर अखेर उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. २९ सप्टेंबरला छाननी होणार आहे. १ आॅक्टोबरपर्यंत माघारीची मुदत आहे. एकंदरीत सर्व शासकीय यंत्रणा आजपासूनच गतिमान झाली. (प्रतिनिधी)