शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पाडापाडीच्या राजकारणामुळेच काँग्रेसशी फारकत : मुश्रीफ

By admin | Updated: June 15, 2015 00:46 IST

फसवणूक केल्याचे ‘पी.एन’ यांचे वक्तव्य चुकीचे

कोल्हापूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी झाली की मतदार पाडापाडीचे राजकारण करतात. त्यात चेअरमन निवडीवेळी बोटे मोजली जातात, हा जिल्हा बँकेच्या चेअरमन निवडीवेळीचा कटू प्रसंग अनुभवला आहे. त्यामुळेच बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसशी फारकत घेतल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकातून दिली. ‘फसवणूक’ व ‘विश्वासघात’ हे शब्द आमच्या शब्दकोशात नसल्याने फसवणूक केल्याचे पी. एन. पाटील यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ‘गोकुळ’मध्ये आमची शक्ती कमी आहे तसेच विधानसभा निवडणुकीत आमच्याकडून काही ‘शब्द’ गेले होते. त्यामुळे साडेसहाशे मते असताना फक्त एकाच मागासवर्गीय जागेवर तडजोड केली व प्रामाणिकपणे पॅनेलला सहकार्य केले. त्याचवेळी आमदार महादेवराव महाडिक यांनी जिल्हा बँकेत सहकार्य करण्याचा ‘शब्द’ दिला होता, तोही त्यांनी पाळला. जिल्हा बँकेची परिस्थिती व कलम ८८ ची चौकशीमुळे ठेवीदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून कमी जागा घेऊन आम्ही बँकेच्या निवडणुकीत तडजोड केली. बाजार समितीच्या निवडणुकीबाबतही पाटणा येथील अधिवेशनाला जाण्यापूर्वी आम्ही पी. एन. पाटील यांच्याशी चर्चा केली पण संजय घाटगे यांच्याबरोबर चर्चा झाली असून त्यांनी सहा जागांची मागणी केली. पुन्हा ११ जूनला आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रवादी-जनसुराज्य पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत त्यांची मागणी मांडली, पण सहा जागा देणे अशक्य होते. आम्ही करवीरमधील दोन जागा देण्याची तयारी दर्शवली. माघारीच्या सकाळी दहा वाजता के. पी. पाटील व आपण ‘पी. एन’ यांच्या निवासस्थानी जाऊन तालुकावार मते व वस्तुस्थितीबद्दल चर्चा केली, तरीही ते सहा जागांवर ठाम राहिले, काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाला दोन जागा घ्या व पॅनेलमध्ये या असे सांगण्याचे धाडस आमचे नव्हते, म्हणून त्यांना माघारीसाठी चार तास वेळ असताना सन्मानपूर्वक पत्राने कळविण्यात आले. संजय घाटगे व इतर मंडळी त्यांच्यासोबत असल्याने त्यांची अडचण होणार नाही, असे आम्हाला वाटले, पण आगामी मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळावे व त्यामध्ये कोणाचा रोष पत्करायला नको, यासाठी शिवसेना व मित्रपक्षांनी पॅनेल केले, त्यात आमचा दोष नसल्याचेही पत्रकात म्हटले आहे.