शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पिताय ना ; मग काळजी घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:29 IST

दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार होण्याचे प्रमाण विशेषत: पावसाळ्यात अधिक असते. पावसाळ्यात नदीचे पाणी अधिकच दूषित झालेले असते. त्यामुळे महानगरपालिका ...

दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार होण्याचे प्रमाण विशेषत: पावसाळ्यात अधिक असते. पावसाळ्यात नदीचे पाणी अधिकच दूषित झालेले असते. त्यामुळे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या पाणीशुद्धिकरणाच्या प्रक्रियेवर मर्यादा येतात. शुद्ध पाण्याच्या निकषांप्रमाणे शुद्धिकरणाची प्रक्रिया होत नाही. परिणामी नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होण्याची दाट शक्यता असते.

बऱ्याच वेळा सार्वजनिक तसेच खासगी वितरण नलिका फुटलेल्या असतात, त्यांना गळती लागलेली असते. त्याची दुरुस्ती वेळेवर केली जात नाही. त्यामुळे वितरण नलिकेतून दूषित पाणी मिसळून ते थेट घरापर्यंत पोहोचते. नागरिकांचा हा निष्काळजीपणा आजारपणावर उठतो. त्यामुळे दैनदिन गरज भागविताना शुद्ध पाणी पिण्यावर भर द्यायला पाहिजे. सध्या कोल्हापूर शहरात मुबलक पाणीपुरवठा होत असला तरी तो शुद्ध होईलच याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे पाणी पिताय ना, मग पुरेश काळजी घ्यायला पाहिजे.

- दूषित पाण्यामुळे होणारे आजार -

दूषित पाणी प्यायल्यामुळे माणसांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होतात. दूषित पाणी प्यायल्याने गॅस्ट्रो, कॉलरा, काविळ, अमिबा, टायफॉईड यासारखे पाच प्रमुख आजार होतात. आजार तसे साधे वाटत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करणे कधी कधी महागात पडू शकते. त्यामुळे वेळीच आपल्या फॅमिली डॉक्टरांकडून उपचार करवून घेणे आवश्यक असते.

- अशी असतात आजाराची लक्षणे -

गॅस्ट्रो, कॉलरा, काविळ, अमिबा, टायफॉईड यासारखे आजार झाल्यास रुग्णांना जुलाब, उलट्या होतात. ताप येतो, पोटात दुखायला लागते, लिव्हरला सूज येते, अशक्तपणा येतो, अपचन होते, भूक मंदावते, आतड्यांना सूज येण्याची शक्यता असते. शौचाद्वारे रक्त पडते, शरीरातील कॅल्शियम कमी होते.

- पाणी उकळून प्यायलेले बरे !

ज्यावेळी आपल्याकडे नळाला गढूळ, दुषित तसेच दुर्गंधीयुक्त पाणी येते, त्यावेळी ते पिण्यास अयोग्य असते. असे दूषित पाणी पिणे टाळले पाहिजे. अगदीच अडचणी असतील तर पाणी १०० अंश सेल्सियस उष्णतेपर्यंत चांगले उकळून गाळून पिणे आवश्यक ठरते. पाणी उकळल्यावर त्यातील बॅक्टेरिया मरतात. उकळलेले पाणी गार करून पिले तरी चालते.

- कोल्हापूरकरांना दररोज १३५ लिटर पाणी -

कोल्हापूर शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार साडेपाच लाख इतकी आहे; परंतु आता ती सव्वासहा लाखांपर्यंत पोहोचली आहे. महानगरपालिका शहर पाणीपुरवठा विभाग शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी शहरातील तीन जलशुद्धिकरण केंद्रातून रोज सरासरी १२० ते १३० एम.एल.डी. पाणीपुरवठा करत आहे. प्रतिदिन प्रतिमाणसी १३५ लिटर पाणी दिले जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाचा आहे.