शहरं
Join us  
Trending Stories
1
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
2
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
3
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
4
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
5
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
6
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
7
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
8
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
9
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
10
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
11
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
12
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
13
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
14
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
15
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
16
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
17
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
20
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात गर्दी आणि कोरोनाची भीती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:24 IST

कोल्हापूर : कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या शक्यतेमुळे शहरातील बाजारपेठेतील नागरिकांची गर्दी आणि या गर्दीमुळे होणारा कोरोनाचा संसर्ग याची भीती ...

कोल्हापूर : कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या शक्यतेमुळे शहरातील बाजारपेठेतील नागरिकांची गर्दी आणि या गर्दीमुळे होणारा कोरोनाचा संसर्ग याची भीती बुधवारी देखील कायम होती. रुग्णांना बेड मिळत नाहीत, रुग्णालयांना ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. तरीही नागरिक बाजारात गर्दी करत आहेत. नागरिकांची ही निष्काळजी संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून शहरातील बाजारपेठेतून खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिक दुकानांच्या दारात मोठ्या रांगा लावत आहेत. सकाळी सात ते अकरा या वेळेतच ही दुकाने सुरू असल्यामुळे ही एकाचवेळी गर्दी दिसत आहे. कडक संचारबंदी, लॉकडाऊन, नियमांची कडक अंमलबजावणी करणार, असे जिल्हा प्रशासनाने जाहीर करूनही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. विशेष म्हणजे चौका-चाैकात पोलीस दिसतात. परंतु तेही लायसन, ओळखपत्र आहे का विचारतात आणि सोडून देतात. कारवाई काहीच होत नसल्याने शहरातील गर्दी वाढतच चालली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील बाजारपेठांत आसपासच्या पाच-सहा जिल्ह्यांतून मालाची आवक-जावक होत असते. त्यामुळे सकाळच्या वेळी लक्ष्मीपुरी धान्य बाजार किंवा मार्केट यार्ड येथे अनेक वाहने येतात. व्यापारी, दुकानदार, ग्राहक येतात. त्यामुळे नियम कडक असूनही ते शिथिल होताना पाहायला मिळत आहे. भाजी विक्रेत्यांना प्रत्येक भागात जाऊन दारोदारी भाजी विक्रीची, तर दुकानदारांना घरपोच सेवा देण्याची परवानगी दिली होती. परंतु भाजी विक्रेत्यांनी भाजी मंडईच्या शेजारील रस्त्यावरच बसून भाजी विकण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळेच विशिष्ट ठिकाणीच गर्दी असलेली दिसते.

बुधवारी दुपारी दोन-अडीचनंतर उन्हाचा ताव वाढेल तशी रस्त्यावरील गर्दी कमी होती. सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर पोलीस रस्त्यावर आले होते. चौका-चौकात रस्त्यावरून फिरणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांची चौकशी करत होते. परंतु कारवाई मात्र काहीच करत नव्हते. कारवाई होत नाही म्हटले की रस्त्यावर गर्दी होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून ही गर्दी वाढतच चालली आहे.