शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

CoronaVirus Lockdown : गुऱ्हाळ घरांची धुराडी पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 5:56 PM

लॉकडाऊनमुळे रसवंतीला लागणारा ऊस जिल्ह्यात शिल्लक आहे.या ऊसाच्या गाळपासाठी जिल्ह्यातील भुयेवाडी (ता.करवीर),बाचणी,उत्रे,वंदूर येथील गुऱ्हाळ घरांची धुराडी पुन्हा सुरू झाली आहेत.

सतीश पाटीलशिरोली : लॉकडाऊनमुळे रसवंतीला लागणारा ऊस जिल्ह्यात शिल्लक आहे.या ऊसाच्या गाळपासाठी जिल्ह्यातील भुयेवाडी (ता.करवीर),बाचणी, उत्रे, वंदूर येथील गुऱ्हाळ घरांची धुराडी पुन्हा सुरू झाली आहेत.कोरोना मुळे संपूर्ण देशभरात गेल्या दिड महिन्या पासुन लॉकडाऊन आहे. सर्व व्यवहार बंद झाले आहेत. ज्या प्रमाणे सर्वच उद्योग आणि व्यवसायांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे तसाच पश्चिम महाराष्ट्रातील रसवंती व्यवसायाला ही बसला आहे.

उन्हाळ्यात कोल्हापूर,सांगली,सातारा येथे मोठ्या प्रमाणात रसवंती व्यवसाय सुरू असतो. यासाठी हे व्यावसायीक शेतकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात उस खरेदी करत असतात. चालू वर्षी ही मोठ्या प्रमाणात रसवंती व्यवसायीकांनी उस खरेदी करुन शेतकऱ्यांना ऍडव्हान्सही काही प्रमाणात दिला होता.

पण ऐन उन्हाळ्यात कोरोनाचा शिरकाव भारतात झाला आणि खबरदारी म्हणून गेली ४५ दिवसापासून संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे रसवंतीचा उस शेतातच अडवून पडला. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व साखरकारखाने बंद झाले होते.गुऱ्हाळघरे ही फेब्रुवारी महिन्यात बंद झाले होते.पण शेतकरीच शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार.शिल्लक उस गाळपासाठी घेऊन शेतकरी गुऱ्हाळघराच्या मालकांच्याकडे आले पण गुऱ्हाळघरेपुन्हा सुरू करायची म्हणजे मनुष्यबळ लागत तरी ही कमी मनुष्यबळावर जिल्ह्यातील भुयेवाडी, वंदूर, उत्रे, बाचणी येथील गुऱ्हाळघरे सुरू झाली आहेत.सर्वसाधारणपणे गुऱ्हाळघरे सुरू करण्याचा हंगाम आॅक्टोबंर महिन्यात सुरू होतो.हा हंगाम पाच ते सहा महिने चालतो.लॉकडाऊनपुर्वीच भुयेवाडी, निगवे दुमाला परिसरातील गुऱ्हाळघरे बंद झाली आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रसवंतीसाठी ८६०३२ या ऊस लागवड केलेली असते. लॉकडाऊनमुळे गेल्या दिड महिन्यांपासून रसवंती व्यवसाय बंद असल्यामुळे रसवंतीचा ऊस शिल्लक राहिला आहे.

रसवंतीचा धंदा मे महिन्यापुरता राहीला आहे.पण लॉकडाऊन वाढल्याने यंदाचा रसवंतीचा व्यावसाय वाया गेल्याने रसवंतीचा ऊस गाळप करण्याचा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला आहे.तसेच आडसाली ऊस व नर्सरीसाठी ऊस रोपांसाठी ऊस डोळा काढून घेऊन शिल्लक राहीलेला ऊस ही गाळपासाठी येत आहे.असा प्रत्येक गुऱ्हाळावर ऊस येतो.

भुये, भुयेवाडी, कासारवाडी,तमदलगे,हातकणंगले येथून ऊस उत्पादक शेतकरी स्वतः तोड करून ऊस पोहोच करत आहेत तर नर्सरीतील ऊसाचे तुकडे पोत्यामध्ये भरून तेही गुऱ्हाळ घरावरती पोच केले जात आहेत. त्यामुळे गुऱ्हाळ घरातील आठ ते दहा मजुरा वरची गुऱ्हाळ घरे सुरू आहेत. सध्या कोल्हापूर बाजार समितीत गुळाला ४००० ते ४२०० रुपये इतका दर मिळत आहे. त्यामुळे गुऱ्हाळघर मालकांनी पुन्हा गुर्हाळ घरे सुरू केली आहेत.महिना-दिड महिना गुऱ्हाळघर सुरू राहतीललॉकडाऊन मुळे उस शेतात शिल्लक आहे.पुढील महिना -दिड महिना उस गाळपासाठी येईल, असे गुऱ्हाळ मालकानी सांगितले.गुळाला चांगला दर...गुळ हंगाम संपला आहे पण शिल्लक राहिलेला उस पुन्हा गाळपासाठी येत असुन गुळाला ४००० ते ४५०० इतका प्रति क्लिंटल दर मिळत आहे. 

रसवंती व्यवसाय बंद असल्यामुळे ८६०३२ ऊस शिल्लक राहिला आहे. ऊस उत्पादक शेतकरी संकटात आला आहे.त्यामुळे आम्ही पुन्हा गुऱ्हाळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रसवंतीचा ऊस,आडसाली ऊस व नर्सरीतील उसाचे तुकडे हा ऊस गुऱ्हाळ घरावर येत आहे.त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत हा गळीत हंगाम सुरू राहील.-सचिन चौगले, गुऱ्हाळघर मालक, भुयेवाडी 

रसवंतीसाठी ८६०३२ जातीचा आडसाली लागण केलेला आणि १२ महीने पुर्ण झालेला ऊस वापरतो. या ऊसासाठी ऊसउत्पादक शेतकऱ्यांना अ‍ॅडव्हान दिलेला असतो.लॉकडाऊनमुळे चालू वर्षी व्यवसाय बंद असल्यामुळे ऊस घेतला नसल्याने अ‍ॅडव्हान बुडाला आहे.तसेच व्यवसाय बंद असल्यामुळे रसवंती गृह चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.सागर पाटील, रसवंती व्यावसायीक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर