शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांच्या खिशातून उत्पादकांच्या पदरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकूळ’ने दूध उत्पादकांना दोन व एक रुपया दरवाढ करत असताना ग्राहकांच्या खिशातून मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकूळ’ने दूध उत्पादकांना दोन व एक रुपया दरवाढ करत असताना ग्राहकांच्या खिशातून मात्र दोन रुपये काढून घेतले आहेत. गेल्या दोन महिन्यांत काटकसरीचा कारभार करत कोट्यवधी रुपयांची बचत केल्याचे संचालक सांगत होते. ग्राहकांच्या माथी न मारता केवळ काटकससरीच्या माध्यमातून उत्पादकांना दोन रुपये जादा देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात ग्राहकांकडून घेऊन उत्पादकांना दिले यामध्येही गाय दूध उत्पादकांबाबत दुजाभाव केला आहे.

‘गोकूळ’मधील मनमानी कारभाराविरोधात रान उठवत नेत्यांनी सत्तांतर घडवले. सत्तेवर आल्यानंतर काटकसरीचा कारभार करत उत्पादकांना दोन रुपये जादा दर देण्याचे वचन दिले होते. नवीन संचालकांनी काटकसरीचा कारभार करत अनेक बचतीचे निर्णय घेतले. कोट्यवधी रुपयांची बचत केल्याने दूध उत्पादकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. याबाबत उत्पादकांकडून दरवाढीची विचारणाही होऊ लागली. मात्र लगेच निर्णय घेता येणार नसल्याचे नेत्यांनी सांगितले. तोपर्यंत ‘अमूल’ने विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ‘गोकूळ’नेही दरवाढीबाबत विचार सुरू केला. विक्री दरात दोन रुपयांची वाढ करून तेच दूध उत्पादकांना देण्यात आले. ग्राहकांच्या खिशातून काढून उत्पादकांच्या पदरात टाकले, यामध्ये ‘गोकूळ’ने काय केले. उलट गाय दूध ग्राहकांकडून दोन रुपये घेतले आणि उत्पादकाला मात्र रुपयाच दिला. असा दुजाभाव केला तर एकट्या म्हैस दूध वाढवून वीस लाख लिटरचा टप्पा तीन वर्षांत सोडाच दहा वर्षांतही गाठता येणार नाही, हे निश्चित आहे.

फुलाच्या पायघड्या घालून नेत्यांचे स्वागत

‘गोकूळ’च्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच दूध दरवाढीची घोषणा संघाच्या नेत्यांनी केली. त्याचबरोबर नेत्यांच्या स्वागतासाठी ताराबाई पार्क कार्यालयाच्या पायऱ्यांवर फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. औक्षण करून नेते पत्रकार परिषदेसाठी आले, याची चर्चा ‘गोकूळ’ वर्तुळात जोरात सुरू होती.

दोन महिन्यांत दोन वेळा बदली

‘गोकूळ’मध्ये सत्तांतर झाल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. एका अधिकाऱ्याची दोन महिन्यांपूर्वी ताराबाई पार्कातून दूध संकलन विभागात केली. तिथे स्थिरस्थावर होते न होते तोपर्यंत मुंबईला बदली केली. राजकीय द्वेषातून बदल्यांचे सत्र सुरू झाल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.