शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारचा वाढीव मदतीचा निकष ठरतोय अडचणीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:28 IST

विश्वास पाटील लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : भाजप सरकारच्या काळात राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीएफ-एनडीआरएफ) निकषाच्या तिप्पट ...

विश्वास पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : भाजप सरकारच्या काळात राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीएफ-एनडीआरएफ) निकषाच्या तिप्पट रक्कम महापुरातील नुकसानीसाठी देण्याचा निर्णय ठाकरे सरकारसाठी अडचणीचा ठरला आहे. तत्कालीन भाजप सरकारने हा निर्णय घेतला तेव्हा २०१९ ला चार जिल्ह्यांत भरपाई झाली होती, आता राज्यातील साडेचार लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तेवढ्यासाठी निधीची तरतूद करताना राज्य सरकारला घाम फुटत आहे. त्यामुळे शासनाने तत्त्वत: मान्यता दिली असली, तरी अजून शासन आदेश निघण्यास विलंब होत आहे.

एकदा एखादा शासन निर्णय झाला, तर त्यापासून सरकारला मागे वळता येत नाही, असाच अनुभव महापुराच्या भरपाईमध्ये येत आहे. कोल्हापूर, सांगली, पुणे व सातारा जिल्ह्यांत २०१९ ला पूर आला तेव्हा तोंडावर विधानसभा निवडणुका होत्या. महापुरात सरकार मदतीला धावून आले नाही म्हणून मुख्यमंत्र्यांबद्दल नाराजी व्यक्त झाली होती. तेव्हा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेच राज्याचे महसूल व मदत आणि पुनर्वसन मंत्री होते. त्यांनी केंद्र सरकार मदतीचे निकष बदलायला तयार नाही म्हणून त्या निकषानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार व राज्य शासनाने स्वत:हून त्या निकषाच्या दुप्पट दराने अशी तिप्पट दराने मदत दिली. त्यामुळेच हेक्टरी ९५ हजार म्हणजेच गुंठ्याला सरासरी ९५० रुपये दराने भरपाई दिली गेली. शेतकऱ्यांना गेल्या सरकारने एवढी मदत दिली असल्याने विद्यमान सरकारनेही तेवढीच किंवा त्याहून जास्त दराने भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी पुढे आली आहे. प्रश्र्न शेतकऱ्यांच्या मदतीचा असल्याने ठाकरे सरकारची कोंडी झाली आहे. कारण यावर्षी महापुराचा तडाखा राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे.

राज्यातील साडेचार लाख हेक्टर पिकांचे महापुरात नुकसान झाले आहे. त्यांतील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना रोख रक्कम देण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारा हजारो कोटींचा निधी कसा उभा करायचा, या चिंतेत ठाकरे सरकार असल्याने मदतीचा शासन आदेश व भरपाई देण्याबाबतही विलंब होत असल्याचे सरकारमधीलच एका जबाबदार मंत्र्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

राज्य सरकारने ११ सप्टेंबर २०२० ला जाहीर केलेली मदत अशी

एकूण मदत : ३०७ कोटी

पहिला हप्ता : सप्टेंबर २०२० - १५३ कोटी ५० लाख

ऑक्टोबर २०२० : १५३ कोटी ५० लाख

प्रत्यक्ष उत्पादनाएवढी मदत..

ऊस व फळ पिकांसाठी हेक्टरी किमान १ लाख रुपयांची मदत मिळू शकते. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे वगळता इतरत्र उसाचे हेक्टरी उत्पादन सरासरी ५५ टन आहे. म्हणजे त्यास तीन हजार दर मिळाला, तरी एक लाख ६५ हजार रुपये चांगल्या पिकाला मिळतात आणि इथे तर पुरात बाद झालेल्या पिकास एक लाख रुपये मिळणार आहेत. राज्य सरकार आपत्तीच्या काळात देत असते ती मदत असते, ती नुकसानभरपाई नसते, असाही मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.