शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीकरांनो सावधान! कोरोना अजून गेला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहर व परिसरातील कोरोना रुग्णसंख्या अद्यापही 'जैसे थे' आहे. शहरात अजूनही दररोज ४० ते ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहर व परिसरातील कोरोना रुग्णसंख्या अद्यापही 'जैसे थे' आहे. शहरात अजूनही दररोज ४० ते ५० कोरोना रुग्णांची भर पडत आहे. पूर्वीपेक्षा काही प्रमाणात कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी दररोज आढळणारे रुग्ण शहरवासीयांच्या चिंतेत भर पाडणारे आहे. प्रशासनाने नियमांमध्ये थोडी शिथिलता दिली आहे. मात्र, शहरातून कोरोना गायब झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी शहरातून कोरोना अद्याप गेलेला नाही, याची खबरदारी घेत वावरले पाहिजे; अन्यथा पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल.

शहरात आढळणा-या रुग्णसंख्येमध्ये दररोज वाढ होत आहे. मात्र, नागरिक व प्रशासनास कोणतेही गांभीर्य नसल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता यावी, तसेच व्यापा-यांनाही व्यापार करता यावा, यासाठी प्रशासनाने काही प्रमाणात सूट दिली आहे. परंतु नागरिक त्याचा गैरफायदा घेत विनामास्क व विनाकारण फिरताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे. शहरातील आठवडी बाजार कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. या बाजारात नागरिकांची चाचणी केली असता अनेकजण पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. यावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही.

राज्य शासनाने कोरोना रुग्णांच्या परिस्थितीनुसार एकूण पाच टप्पे केले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा अद्याप चौथ्याच टप्प्यात आहे. तसेच जिल्ह्यातील प्रमुख मंत्र्यांनी अजून निर्बंध कायम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे कोरोना महामारीतून शहरवासीयांची सुटका झालेली नाही. सध्याच्या घडीला एकूण रुग्णसंख्या आठ हजारांपर्यंत पोहचली असून, ३८० जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी काळजी करणारी आहे. तरीही कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून अनेकजण बिनदिक्कतपणे फिरताना दिसत आहेत. नागरिकांनी असेच बेजबाबदारपणे वागल्यास कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता आहे. जर पुन्हा एकदा लॉकडाऊन झाल्यास वस्त्रनगरीस परवडणारे नाही.

चौकट

सर्वाधिक मृत्यूदर असलेला जिल्हा

राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना परिस्थिती सुधारत असून, निर्बंध शिथिल होत आहेत. मात्र, अद्यापही कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर राज्यात सर्वाधिक आहे. त्याबरोबर इचलकरंजी शहराचाही मृत्यूदर सर्वाधिक आहे. यामुळे शहरावर निर्बंधाची टांगती तलवार कायम आहे.