शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ आता दोघांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 01:23 PM2020-09-17T13:23:38+5:302020-09-17T13:27:21+5:30

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या वहिती खातेधारक शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांपैकी एकास आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. कृषी विभागाने त्यासंबंधीचा शासन आदेश शनिवारी काढला आहे. राज्यात सुमारे १ कोटी ५२ लाख खातेदार शेतकरी असून त्याच्या दुप्पट (३ कोटी ४ लाख) लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल. शेतकऱ्याला स्वत:शिवाय अन्य कुणाला या योजनेचा लाभ द्यायचा. त्याचे नाव योजनेसाठी (नॉमिनीप्रमाणे) अगोदर सुचवावे लागेल.

Benefit of Farmers Accident Insurance Scheme for both now | शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ आता दोघांना

शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ आता दोघांना

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ आता दोघांनाशासनाचा निर्णय : कुटुंबातील खातेदार नसलेल्या एकास लाभ

विश्वास पाटील 

कोल्हापूर : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या वहिती खातेधारक शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांपैकी एकास आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. कृषी विभागाने त्यासंबंधीचा शासन आदेश शनिवारी काढला आहे.

राज्यात सुमारे १ कोटी ५२ लाख खातेदार शेतकरी असून त्याच्या दुप्पट (३ कोटी ४ लाख) लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल. शेतकऱ्याला स्वत:शिवाय अन्य कुणाला या योजनेचा लाभ द्यायचा. त्याचे नाव योजनेसाठी (नॉमिनीप्रमाणे) अगोदर सुचवावे लागेल.

शेती करताना होणारे अपघात किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना कायमचे अपंगत्व येते. कर्त्या व्यक्तीस अपघात झाल्याने कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते. अशा कुटुंबांना लाभ देण्यासाठी राज्य शासनातर्फे ही मूळ योजना २००४ पासून राबविण्यात येत अहे.

योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यास २ लाख रकमेचे विमा संरक्षण दिले जाते; परंतु आतापर्यंत एकट्या शेतकऱ्यालाच या योजनेचा लाभ मिळत होता. त्यामुळे योजनेचा लाभ कुटुंबियांनाही मिळावा, अशी मागणी खूप दिवसांपासून सुरू होती.

कशासाठी मिळणार विमा संरक्षण

वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात.

कुणाला मिळणार संरक्षण

राज्यातील १ कोटी ५२ लाख खातेदार शेतकरी व खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य त्यामध्ये आई-वडील,पती-पत्नी मुलगा किंवा अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती.

वयाची अट

१० ते ७५ वयोगटांतील कोणत्याही व्यक्तीस शिवाय प्रत्येक दिवसाच्या २४ तासांसाठी योजना लागू राहील.

किती मिळणार भरपाई

  • मृत्यू झाल्यास २ लाख, दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय किंवा एकाचवेळी एक हात
  •  एक पाय व एक डोळा निकामी झाल्यासही २ लाख मिळणार
  • एक डोळा, एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास १ लाख रुपये मिळणार


विमा हप्त्याचे काय

योजनेंतर्गत शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही विमा कंपनीकडे स्वतंत्ररित्या विमा हप्ता भरण्याची गरज नाही. ही संपूर्ण रक्कम शासनामार्फत विमा कंपनीकडे भरली जाईल. शेतकऱ्यांने स्वतंत्रपणे अन्य कोणत्याही विमा योजनेचे संरक्षण जरी घेतले असले तरी त्याचा योजनेशी काही संबंध नाही. या योजनेंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्रच असेल.

Web Title: Benefit of Farmers Accident Insurance Scheme for both now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.