शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर खंडपीठासाठी आंदोलन तीव्र

By admin | Updated: September 12, 2014 23:36 IST

विवेक घाटगे : कोल्हापूर खंडपीठासाठी वकिलांची मोर्चेबांधणी

सिंधुदुर्गनगरी : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी पुन्हा एकदा वकिलांनी कंबर कसली आहे. सहाही जिल्ह्यातील वकिलांची भेट घेऊन कोल्हापूर येथे या सर्वांचा लवकरच मेळावा घेऊन आगामी आंदोलनाचे धोरण निश्चित केले जाणार आहे आणि स्वतंत्र खंडपीठाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र करण्याचे नियोजन करू, असे प्रतिपादन उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी केले.मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे, यासाठी कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सहाही जिल्ह्यातील वकिलांचा संघर्ष सुरू असून, हा संघर्ष अधिक तीव्र करून खंडपीठाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सध्या कोल्हापूर खंडपीठ कृती समितीच्यावतीने कोल्हापुरातील वकील सहाही जिल्ह्यांचा प्रवास करीत असून, आज हे सर्व वकील सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा वकील संघटना सभागृहात अ‍ॅड. राजेंद्र रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समिती अध्यक्ष अ‍ॅड. घाटगे बोलत होते. यावेळी सचिव राजेंद्र मंडलिक, कोल्हापूर नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक ठाकूर, अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, अ‍ॅड. विनय कदम, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटना सचिव अ‍ॅड. विरेश नाईक, अ‍ॅड. व्ही. पी. चिंदरकर, अ‍ॅड. राजीव बिले, अ‍ॅड. दीपक नेवगी, अ‍ॅड. उमेश सावंत, जिल्हा सरकारी वकील अमोल सावंत आदी उपस्थित होते.यावेळी अ‍ॅड. विवेक घाटगे म्हणाले की, ५८ दिवसांच्या आंदोलनात सर्वांनी सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंदोलनाला चांगली साथ मिळाली. मुख्य न्यायमूर्तींनी मुख्यमंत्र्यांना या खंडपीठासंदर्भात ठराव घेण्याबाबत कळविले आहे. तरीही जोवर खंडपीठ अस्तित्त्वात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवावे लागेल. सभाध्यक्ष अ‍ॅड. रावराणे म्हणाले, लोकन्यायालये, कायदाविषयक प्रबोधन शिबिरे आणि न्यायालयांच्या विविध उपक्रमांवर वकिलांनी यापुढे बहिष्कार घालावा लागेल तरच ते आंदोलन आणखीन प्रभावी होईल. हुबळी खंडपीठासाठी तेथील वकिलांनी छेडलेल्या आंदोलनाचे उदाहरण अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी दिले. खंडपीठासाठी सात वेळा पाठविलेला प्रस्ताव तेथील उच्च न्यायालयाने नाकारला. शेवटी आठव्यावेळी मंजूर केला. तोपर्यंत तेथील वकिलांनी चिकाटी सोडली नव्हती. अ‍ॅड. विनय कदम, अ‍ॅड. हलगे यांनी एकजुटीने हा लढा लढला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. आंदोलन तीव्र करण्यासाठी आमचा सहभाग आहे, असे अ‍ॅड. राजीव बिले यांनी सांगितले. अ‍ॅड. विरेश नाईक यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कोल्हापुरातून सुमारे ४० वकील उपस्थित होते. (प्रतिनिधी)